महाराष्ट्र

राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी

संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

का वाढली थकबाकी

कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनामुळे अनेक शेतकरी थकबाकी भरत नाहीत.

नैसर्गिक आपत्त्या: मॉन्सूनपूर्व पाऊस, अतिवृष्टी, महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी कर्ज फेडू शकत नाहीत.

हमीभाव आणि एफआरपी: पिकांना योग्य हमीभाव न मिळणे आणि उसाची एकरकमी एफआरपी (FRP) न मिळणे ही देखील प्रमुख कारणे आहेत.

CIBIL स्कोअरची अडचण: बॅंकांकडून सिबिल (CIBIL) स्कोअर तपासला जात असल्याने, थकबाकीदार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत, जरी याबाबत आदेश नसले तरी.

‘या’ १५ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक थकबाकी

छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये शेती कर्जाची सर्वाधिक थकबाकी आहे. यात प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे:

छत्रपती संभाजीनगर

अहिल्यानगर

बीड

बुलढाणा

जालना

कोल्हापूर

मुंबई

नागपूर

नांदेड

नाशिक (२७९० कोटी)

धाराशिव

परभणी

पुणे

सोलापूर (२६८१ कोटी)

यवतमाळ (२२५६ कोटी)

विशेषतः बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दीड लाख ते सव्वा दोन लाख शेतकरी थकबाकीत आहेत.

थकबाकीदार शेतकऱ्यांची सद्यस्थिती

एकूण शेतकरी: १,२९,३२,४८७

थकबाकीदार शेतकरी: २०,३७,२१०

एकूण थकीत रक्कम: ३१,२५३.५९ कोटी रुपये

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

18 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

21 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

25 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

22 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

22 तास ago