महाराष्ट्र

भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडू देणार नाही; अस्लम शेख

मुंबई: शेकडो वर्ष जूनी असलेलेली भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी काहीही झाले तरी तोडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी घेतल्याने बुधवारी चेतना कॉलेज, वांद्रे येथे पार पडलेली मुंबई उपनगर जिल्हा नियोजनची बैठक वादळी ठरली आहे.

मालाड-पश्चिम येथील भाटी गावातील हिंदू स्मशानभूमी तोडण्याची याचिका जिल्हाधिकाऱ्यां मार्फत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्याने अस्लम शेख आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ही स्मशानभूमी अनधिकृत असून ती पाडण्यासंदर्भात याआधी चेतन व्यास नावाच्या व्यक्तिने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने या याचिकेची दखल घेत मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सागरी क्षेत्र प्राधिकरण (MCZMA) यांना स्मशानभूमी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र भाटी मच्छीमार ग्रामविकास मंडळाची बाजू न ऐकून घेता, नोटीस न देता, कोणतीही सुनावणी न घेता ही स्मशानभूमी तोडण्याची कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाई विरोधात भाटी मच्छीमार ग्रामविकास मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात ही स्मशानभूमी १९९० पूर्वीची असल्याचे पुरावे (बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पावत्या) मंडळाने सादर केले. तसेच ही स्मशानभूमी सीआर झेड २ मध्ये येत असल्याच्या याचिकाकर्त्याच्या दाव्यावर सदर स्मशानभूमी एमसीझेडएमए अस्तित्वात येण्याआधी पासूनची आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध झाले. या संदर्भात याचिकाकर्ते चेतन व्यास यांना मुंबई उच्च न्यायालयाने रुपये एक लाखांचा दंड ठोठावत त्यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.

उच्च न्यायालयाने ही स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास त्यानंतर दिले होते. स्मशानभूमी पुन्हा बांधून दिल्यानंतरही पुन्हा या स्मशानभूमी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने भाटी गावच्या ग्रामस्थांमध्ये प्रशासनाबद्दल प्रचंड असंतोषाची भावना आहे. याचच प्रतिबिंब आजच्या मुंबई उपनगर जिल्हा नियोजनच्या बैठकीत उमटलेलं दिसल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

4 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

4 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

4 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

4 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

4 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

5 तास ago