महाराष्ट्र

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला आणि महायुतीलाही मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पुनरागमन केलं. जनतेमध्ये जाऊन आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेची प्रखरतेने अंमलबजावणी केली, शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांची वीजबिल माफी दिली, त्यानंतर शेतकऱ्यांचं वीजबिल शून्यावर पोहोचलं. लोकांना आम्ही पायाभूत सुविधांचं अभिवचन दिलं, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला विजय प्राप्त करून दिला, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमानपूर्वक सांगतो, विधानसभेत 59 जागेवरती घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढलो आणि 41 जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळालं. सरकार स्थापन झाले सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, आठ ते नऊ वर्षानंतर मनपा नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

या काळात मोठ-मोठ्या पक्षांमध्ये प्रदीर्घकाळ पदावर राहिलेले, अनेक पदाधिकारी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, विदर्भापासून ते कोकणापर्यंत सर्वच भागांमध्ये पक्षाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजुला संघटन वाढवून संघटनेत शिस्त आणणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रमुखांचे मनोगत ऐकून घेणे हाच सर्वांचा हेतू आहे, उत्तर महाराष्ट्र जळगाव ,नंदुरबार ,धुळे ,नाशिक काल संभाजीनगर ,जालना आणि आज हिंगोली संध्याकाळी परभणी असा हा दौरा आहे , असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

18 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

23 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

23 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

23 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

23 तास ago