महाराष्ट्र

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

मुंबई: लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला आणि महायुतीलाही मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पुनरागमन केलं. जनतेमध्ये जाऊन आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेची प्रखरतेने अंमलबजावणी केली, शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांची वीजबिल माफी दिली, त्यानंतर शेतकऱ्यांचं वीजबिल शून्यावर पोहोचलं. लोकांना आम्ही पायाभूत सुविधांचं अभिवचन दिलं, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला विजय प्राप्त करून दिला, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमानपूर्वक सांगतो, विधानसभेत 59 जागेवरती घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढलो आणि 41 जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळालं. सरकार स्थापन झाले सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, आठ ते नऊ वर्षानंतर मनपा नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

या काळात मोठ-मोठ्या पक्षांमध्ये प्रदीर्घकाळ पदावर राहिलेले, अनेक पदाधिकारी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, विदर्भापासून ते कोकणापर्यंत सर्वच भागांमध्ये पक्षाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजुला संघटन वाढवून संघटनेत शिस्त आणणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रमुखांचे मनोगत ऐकून घेणे हाच सर्वांचा हेतू आहे, उत्तर महाराष्ट्र जळगाव ,नंदुरबार ,धुळे ,नाशिक काल संभाजीनगर ,जालना आणि आज हिंगोली संध्याकाळी परभणी असा हा दौरा आहे , असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

न्हावरे येथे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण; पती, सासू-सासऱ्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…

3 तास ago

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

13 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

13 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago