महाराष्ट्र

दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ED अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

रांची: दोन मुख्यमंत्र्‍याच्या अटकेच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जवळपास १६ वर्षे ते सेवेत होते. सक्तवसुली संचलनालयात कार्यरत असताना त्यांच्याच देखरेखीखाली दोन मुख्यमंत्र्‍यांविरोधात अटकेची कारवाई झाली होती. कपिल राज यांचा राजीनामा अर्थ मंत्रालयालं स्वीकारलेला आहे.

कपिल राज २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय ६० वर्षे असतं. त्यामुळे राज यांच्याकडे १५ वर्षे शिल्लक होती. राज जवळपास ८ वर्षे ईडीमध्ये कार्यरत होते. राजीनामा देण्याआधी ते दिल्लीत जीएटीच्या इंटेलिजन्स विभागात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते.

ईडीमध्ये असताना जानेवारी २०२४ मध्ये कपिल राज यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांचीतील एका कथित भूखंड घोटाळा प्रकरणात अटक केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते असलेल्या सोरेन यांनी अटकेपूर्वी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेत राजीनामा सोपवला आहे. कपिल राज या बैठकीला हजर होते. सोरेन यांना राज यांच्याच नेतृत्त्वाखालील पथकानं अटक केली होती.

यानंतर मार्च २०२४ मध्ये राज यांच्या पथकानं दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाची झडती घेतली. यानंतर काही वेळातच राज यांनी केजरीवालांचं निवासस्थान गाठलं. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, राज अशा हायप्रोफाईल राजकीय अटकांसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करायचे. प्रश्नांना अंतिम स्वरुप देण्याचं कामही तेच करायचे. झाडाझडती सुरु असताना ते स्वत: घटनास्थळी पोहोचायचे. आपल्या पथकाचं मनोधैर्य उंचावण्याचं काम कपिल राज करायचे.

कपिल राज यांनी ईडीच्या रांची झोनचे संयुक्त संचालक म्हणून काम केलं आहे. एजन्सीच्या मुख्यालय तपास युनिटकडून करण्यात येणाऱ्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमधील कारवायांची देखरेखदेखील त्यांनी केली आहे. मुंबईत ईडीचे उपसंचालक असताना त्यांनी नीर मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणांचाही तपास केला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

7 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

7 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

9 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

13 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

13 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

13 तास ago