महाराष्ट्र

दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ED अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

रांची: दोन मुख्यमंत्र्‍याच्या अटकेच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जवळपास १६ वर्षे ते सेवेत होते. सक्तवसुली संचलनालयात कार्यरत असताना त्यांच्याच देखरेखीखाली दोन मुख्यमंत्र्‍यांविरोधात अटकेची कारवाई झाली होती. कपिल राज यांचा राजीनामा अर्थ मंत्रालयालं स्वीकारलेला आहे.

कपिल राज २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय ६० वर्षे असतं. त्यामुळे राज यांच्याकडे १५ वर्षे शिल्लक होती. राज जवळपास ८ वर्षे ईडीमध्ये कार्यरत होते. राजीनामा देण्याआधी ते दिल्लीत जीएटीच्या इंटेलिजन्स विभागात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते.

ईडीमध्ये असताना जानेवारी २०२४ मध्ये कपिल राज यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांचीतील एका कथित भूखंड घोटाळा प्रकरणात अटक केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते असलेल्या सोरेन यांनी अटकेपूर्वी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेत राजीनामा सोपवला आहे. कपिल राज या बैठकीला हजर होते. सोरेन यांना राज यांच्याच नेतृत्त्वाखालील पथकानं अटक केली होती.

यानंतर मार्च २०२४ मध्ये राज यांच्या पथकानं दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाची झडती घेतली. यानंतर काही वेळातच राज यांनी केजरीवालांचं निवासस्थान गाठलं. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, राज अशा हायप्रोफाईल राजकीय अटकांसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करायचे. प्रश्नांना अंतिम स्वरुप देण्याचं कामही तेच करायचे. झाडाझडती सुरु असताना ते स्वत: घटनास्थळी पोहोचायचे. आपल्या पथकाचं मनोधैर्य उंचावण्याचं काम कपिल राज करायचे.

कपिल राज यांनी ईडीच्या रांची झोनचे संयुक्त संचालक म्हणून काम केलं आहे. एजन्सीच्या मुख्यालय तपास युनिटकडून करण्यात येणाऱ्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमधील कारवायांची देखरेखदेखील त्यांनी केली आहे. मुंबईत ईडीचे उपसंचालक असताना त्यांनी नीर मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणांचाही तपास केला होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

5 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

5 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

5 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

5 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

6 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

7 तास ago