रांची: दोन मुख्यमंत्र्याच्या अटकेच्या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कपिल राज यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जवळपास १६ वर्षे ते सेवेत होते. सक्तवसुली संचलनालयात कार्यरत असताना त्यांच्याच देखरेखीखाली दोन मुख्यमंत्र्यांविरोधात अटकेची कारवाई झाली होती. कपिल राज यांचा राजीनामा अर्थ मंत्रालयालं स्वीकारलेला आहे.
कपिल राज २००९ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ते ४५ वर्षांचे आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. सरकारी अधिकाऱ्यांसाठी निवृत्तीचं वय ६० वर्षे असतं. त्यामुळे राज यांच्याकडे १५ वर्षे शिल्लक होती. राज जवळपास ८ वर्षे ईडीमध्ये कार्यरत होते. राजीनामा देण्याआधी ते दिल्लीत जीएटीच्या इंटेलिजन्स विभागात अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होते.
ईडीमध्ये असताना जानेवारी २०२४ मध्ये कपिल राज यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना रांचीतील एका कथित भूखंड घोटाळा प्रकरणात अटक केली होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते असलेल्या सोरेन यांनी अटकेपूर्वी राजभवनात जाऊन राज्यपालांची घेत राजीनामा सोपवला आहे. कपिल राज या बैठकीला हजर होते. सोरेन यांना राज यांच्याच नेतृत्त्वाखालील पथकानं अटक केली होती.
यानंतर मार्च २०२४ मध्ये राज यांच्या पथकानं दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाची झडती घेतली. यानंतर काही वेळातच राज यांनी केजरीवालांचं निवासस्थान गाठलं. ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, राज अशा हायप्रोफाईल राजकीय अटकांसाठी आवश्यक प्रश्नावली तयार करायचे. प्रश्नांना अंतिम स्वरुप देण्याचं कामही तेच करायचे. झाडाझडती सुरु असताना ते स्वत: घटनास्थळी पोहोचायचे. आपल्या पथकाचं मनोधैर्य उंचावण्याचं काम कपिल राज करायचे.
कपिल राज यांनी ईडीच्या रांची झोनचे संयुक्त संचालक म्हणून काम केलं आहे. एजन्सीच्या मुख्यालय तपास युनिटकडून करण्यात येणाऱ्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि गुंतागुंतीच्या प्रकरणांमधील कारवायांची देखरेखदेखील त्यांनी केली आहे. मुंबईत ईडीचे उपसंचालक असताना त्यांनी नीर मोदी, मेहुल चोक्सी, डीएचएफएल आणि इक्बाल मिर्चीशी संबंधित प्रकरणांचाही तपास केला होता.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…