मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसची महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय बैठक पार पडली. बैठकीला माजी मुख्यमंत्री Sushilkumar Shinde, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar, Balasaheb Thorat, Naseem Khan, Satej Patil यांच्यासह अनेक प्रमुख नेते, खासदार, आमदार आणि BLA-1 पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मतदार यादीतील कथित गैरप्रकार, वोटचोरी आणि SIR मोहिमेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बूथस्तरावर संघटन मजबूत करण्याबरोबरच प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभर जनजागृती मोहीम राबवून मतदारांचे अधिकार अबाधित राखण्यासाठी काँग्रेस आक्रमकपणे मैदानात उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला केरळ विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या विजयाबद्दल Mallikarjun Kharge यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच केरळचे प्रभारी Ramesh Chennithala यांनी गृहमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला.
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, SIR मोहिमेसंदर्भात BLA-1 कार्यकर्त्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली असून राज्यभर बूथस्तरावर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. मतदार यादी पडताळणी, हरकती आणि दुरुस्त्यांबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक मतदाराचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले.
SIR मोहिमेसाठी विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णयही काँग्रेसने घेतला असून Satej Patil यांची समिती प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजीत सपकाळ हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
राज्यातील पेट्रोल-डिझेल टंचाईच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ते गझनी झाले आहेत हे पुन्हा सिद्ध झाले आहे. जनतेच्या गंभीर प्रश्नांकडे सरकारचे कोणतेही लक्ष नाही.”
आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी भाजपवर समाजात तेढ निर्माण करण्याचा आरोप केला. “जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मराठा, ओबीसी, धनगर आणि इतर समाजघटकांना भाजप महायुती फसवत आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, Vijay Wadettiwar यांनी राज्य सरकारवर भ्रष्टाचार आणि शेतकरी प्रश्नावरून जोरदार हल्ला चढवला. “या सरकारमध्ये शंभरहून अधिक घोटाळे झाले आहेत. निष्पक्ष चौकशी झाली तर सरकारमधील अनेकजण गजाआड जातील,” असा दावा त्यांनी केला. तसेच राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करत ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होत असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू…
मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी…
मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक…
कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात ‘एमडी’ ड्रग, गांजा आणि इतर अमली पदार्थांनी आधीच तरुणाईला…