मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असुन, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची अधिकृत दखल घेतल्याने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आयोगाने केस क्रमांक ३१८६/१३/२३/२०२६ अंतर्गत प्रकरण नोंद करुन संबंधित यंत्रणांकडुन अहवाल मागविल्याची माहिती समोर आली आहे.

निखिल इचके यांचा मृत्यू हा साधा रस्ता अपघात नसून, प्रेमविवाहाच्या रागातुन रचलेल्या पुर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच स्थानिक पोलिसांकडुन निष्पक्ष तपास होत नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक तसेच मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर आयोगाने थेट हस्तक्षेप केल्याने या प्रकरणाची चर्चा संपुर्ण पुणे जिल्ह्यात सुरु झाली आहे.

प्रेमविवाह ठरला का जीवघेणा…?

इचके कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, निखिल याने प्रेमविवाह केला होता. मात्र या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. विवाहानंतर मुलीला जबरदस्तीने माहेरी नेण्यात आल्याचा आरोप इचके कुटुंबाने केला आहे. इतकेच नव्हे तर “त्याला जिवंत ठेवणार नाही,” अशा धमक्या वारंवार दिल्या जात असल्याचा दावा निखिल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मयत निखिल यांना संबंधित तरुणीकडुन फोनवरुन आपण गर्भवती असुन माहेरी छळ सहन करत असल्याची माहिती दिली गेली होती, असा धक्कादायक दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणामागे कौटुंबिक वैमनस्य आणि दबावाचे गंभीर धागेदोरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

निखिलचा अपघात की घातपात…?

निखिलचा कथित अपघात ज्या ठिकाणी झाला, ते ठिकाण मुलीच्या माहेरच्या गावाजवळ असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. विशेष म्हणजे, अपघातावेळी निखिल यांच्यासोबत असलेल्या मित्राला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर अपघात इतका भीषण होता, तर दुसऱ्या व्यक्तीला किरकोळ जखमही कशी नाही…?” असा सवाल निखिल यांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे.

मोबाईल डेटा डिलीट; इलेक्ट्रॉनिक पुरावे गायब…?

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निखिल यांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप डेटा डिलीट झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यामुळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का…? असा संशय व्यक्त होत आहे. तसेच CCTV फुटेज, कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि अन्य इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची सखोल तपासणी करण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “तपासात जाणीवपूर्वक ढिलाई केली जात आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

स्थानिक तपास यंत्रनेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह…?

“आम्हाला स्थानिक तपास यंत्रणेवर विश्वास उरलेला नाही,” असे इचके कुटुंबियांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून न होता विशेष तपास पथक (SIT) किंवा CBI मार्फत व्हावा, अशीही मागणी निखिल यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, पुढील १५ दिवसांत दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निखिल यांच्या आई जनाबाई इचके आणि वडील संदीप इचके यांनी दिल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मानवाधिकार आयोगाच्या हस्तक्षेपामुळे तपासाला वेग…?मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची थेट दखल घेतल्याने आता या प्रकरणातील तपासावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. आयोगाकडुन मागविण्यात आलेला अहवाल, पोलिसांची भूमिका आणि पुढील कायदेशीर कारवाई याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निखिल इचके यांच्या मृत्यूमागचे खरे कारण नेमके काय…? हा अपघात होता की नियोजनबद्ध घातपात…? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणार आहेत. 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई ते सुरजागड! विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; एकनाथ शिंदे

मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…

4 तास ago

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार…

4 तास ago

‘कॉकरोच जनता पार्टी’ ते संविधानप्रेम; बदलले फक्त शब्द नव्हे, भूमिकाही!

मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी…

4 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक…

4 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी…

8 तास ago

नशेचा नवा ट्रेंड! शिरूर तालुक्यात पाईप चिकटविण्याच्या लिक्विडचा नशेसाठी वापर…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात ‘एमडी’ ड्रग, गांजा आणि इतर अमली पदार्थांनी आधीच तरुणाईला…

11 तास ago