पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. १६५ प्रभाग रचना असलेल्या पुणे महापालिकेत भाजपने तब्बल ११९ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. या दणदणीत विजयात केंद्रीय मंत्री, भाजप नेते आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.या निवडणुकीत इतर पक्षांची अवस्था बिकट झाल्याचे चित्र असून, विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
दरम्यान, पुण्यातील राजकारणात नेहमी चर्चेत असणारे ठाकरे गटाचे आक्रमक नेते वसंत मोरे यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. पुणे महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या निकालाने कात्रज परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी वसंत मोरे यांचा सुमारे ११०० मतांनी पराभव केला आहे.
पराभवानंतरची पोस्ट ठरली चर्चेचा विषय
पराभवानंतर वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.“कात्रजच्या जनतेने त्यांना जमिनीवर आणलं” असे म्हणत, “परिणाम तर भोगावे लागतील ना…” असे सूचक वक्तव्य त्यांनी पोस्टमध्ये केले आहे. या पोस्टमधून मोरे यांनी नेमका कुणाला इशारा दिला आहे, याबाबत विविध चर्चा रंगत आहेत.
नेमकं काय म्हणाले वसंत मोरे?
वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,“चार वर्ष पुणे शहरात कोणतेही पद नसताना 2022 ते 2026 गरीब मायबाप जनतेचा आधार बनून होतो. आणि आता तर २० हजार ८६७ पीडित, शोषित, प्रामाणिक जनतेने आशीर्वाद दिला आहे. परिणाम तर भोगावे लागतील ना…”
मुलगा रुपेश मोरे यालाही पराभव
या निवडणुकीत वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे देखील रिंगणात होता. मात्र, प्रभाग क्रमांक ४० (ड) मधून भाजपच्या उमेदवार रंजना कुंडलिक टिळेकर यांनी रुपेश मोरे यांचा पराभव केला. ही लढत टफ मानली जात होती, मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच रुपेश मोरे पिछाडीवर पडल्याने अखेर रंजना टिळेकर विजयी ठरल्या.
पुणे महापालिकेच्या निकालानंतर भाजपचा विजय जितका चर्चेत आहे, तितकीच वसंत मोरे यांच्या पराभवानंतरच्या भूमिकेची आणि सूचक पोस्टचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…