छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो गुपचूप हलवण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.
नेमकी घटना काय?
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातून एक कार घरगुती साहित्यासह निघाली होती. त्या कारमध्ये एक गादी संशयास्पदरीत्या गुंडाळलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. गादी उघडून पाहिल्यावर त्यामध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला.
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कार जप्त करून चौकशी सुरू केली. चौकशीत सावत्र आईने धक्कादायक माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, तरुणीचे प्रेमसंबंध होते आणि त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही केवळ अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो, असे तिने सांगितले. मात्र, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मृतदेह गुपचूप हलवण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिक बळावला आहे.
आत्महत्या की घातपात?
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे वाळूज परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…