महाराष्ट्र

राज्यसभेसाठी भाजपचं ‘धक्कातंत्र’ पुन्हा अ‍ॅक्टिव्ह? महाराष्ट्रातील ७ जागांवर मोठी राजकीय हालचाल

मुंबई: राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मार्चमध्ये मतदान होणार असून त्यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. विधानसभेतील सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार भाजपचे चार उमेदवार सहज विजयी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजप यावेळी कोणाला संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

२ एप्रिल २०२६ रोजी खालील सात खासदारांचा कार्यकाळ संपत आहे 

Sharad Pawar (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

Fauzia Khan (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट)

Rajani Patil (काँग्रेस)

Priyanka Chaturvedi (शिवसेना – उबाठा)

Ramdas Athawale (रिपाई – आठवले)

Dhairyasheel Patil (भाजप)

Bhagwat Karad (भाजप)

रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री असून दलित चेहरा म्हणून त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या चार जागा जवळपास निश्चित मानल्या जात असल्याने उर्वरित नावांवर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

निष्ठावंतांना संधी? चर्चेत ही नावं

भाजपकडून यंदा संघटननिष्ठ नेत्यांना संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. त्यात Vinod Tawde, Vinay Sahasrabuddhe आणि Sunil Deodhar यांची नावं आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे.

२०१९ मध्ये विनोद तावडे यांचं विधानसभा तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र त्यांनी कोणतीही नाराजी न दर्शवता पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. २०१९ पासून ते संसदीय राजकारणात नसल्याने यंदा त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘धक्कातंत्रा’ची परंपरा कायम राहणार?

भाजपने याआधीही राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकांमध्ये अनपेक्षित नावांना संधी देत ‘धक्कातंत्र’ वापरले आहे. त्यामुळे यंदाही शेवटच्या क्षणी एखादं अनपेक्षित नाव जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.लोकसभा निवडणुकीला अजून तीन वर्षांचा कालावधी असल्याने जातीय किंवा प्रादेशिक समीकरणांपेक्षा संघटननिष्ठा आणि राजकीय रणनीतीला प्राधान्य दिलं जाईल, अशी चर्चा आहे.आता भाजपकडून अंतिम निर्णय कधी आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

7 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

7 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago