महाराष्ट्र

अजितदादांच्या विकास व्हिजनला समर्पित अर्थसंकल्प; शेतकरी, रोजगार व पायाभूत सुविधांवर मोठा भर; धनंजय मुंडे

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा दिवंगत नेते अजित पवार यांच्या विकासाच्या व्हिजनला समर्पित असून २०४७ पर्यंत विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

मुंडे म्हणाले की, महाराष्ट्राला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प प्रगतिशील, शाश्वत, सुशासन आणि सर्वसमावेशक या चार स्तंभांवर आधारित असून राज्याच्या सर्वांगीण विकासाची चतुसूत्री यात मांडण्यात आली आहे.

२५ सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्याबद्दल मुंडे यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय महायुती सरकारवर जनतेने टाकलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी नार-पार प्रकल्पातून ५४ टीएमसी पाणी आणण्याचा निर्णय तसेच विदर्भ, खानदेश आणि कोकणातील नदीजोड प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता व निधी देण्यात आल्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले.

ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, महामार्ग, सागरी मार्ग, मेट्रोसारखे मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून एक हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या प्रत्येक गावाला काँक्रिट रस्त्याने जोडण्याचा निर्णय आगामी काळात क्रांतिकारक ठरेल, असेही मुंडे यांनी म्हटले.

याशिवाय बीड जिल्ह्यातील वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जिल्ह्यातील रेल्वे मार्गासाठी राज्याचा हिस्सा, तसेच स्वामी रामानंद तिर्थ रूरल मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या विकासकामांसाठी निधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य लोकसेवा आयोग व इतर शासकीय विभागांमध्ये ७५ हजार पदनिर्मिती, दीड लाख उद्योजक आणि ५० हजार स्टार्टअप्स तयार करण्याचे लक्ष्य रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.दिवंगत अजित पवार यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याचा आणि त्यांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत मुंडे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

4 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

11 तास ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

1 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

1 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

1 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

1 दिवस ago