संभाजीनगर: उन्हाचा कहर सुरूच छत्रपती संभाजीनगर शहरातील तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून, होरपळ वाढली आहे. अशातच दुपारच्या वेळेस सिग्नलवर थांबणं म्हणजे जणू गरम तव्यावर उभं राहण्यासारखे आहे त्यामुळे दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत सिग्नल बंद ठेवण्यात येणार आहे.
ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा मोठा निर्णय
रखरखत्या उन्हामुळे वाहतूक पोलिसांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत सर्व सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून संध्याकाळी ४ नंतर ते रात्री ९.३० पर्यंत सिग्नल नियमित सुरू राहतील.
तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी आळीपाळीने चौकात तैनात राहणार आहेत.
पोलिसांचे आवाहन – नागरिकांनी संयम बाळगावा, नियमांचे पालन करावे.
मुकुंदनगर रेल्वेगेट पाच दिवस बंद
चिकलठाणा-करमाडदरम्यान रेल्वेमार्ग दुरुस्ती होणार असून, रेल्वेगेट क्रमांक-५६, मुकुंदनगर २३ ते २७ एप्रिल दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहील.
या काळात प्रवाश्यांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा
शिवाजीनगर भुयारी मार्ग
चिकलठाणा भुयारी मार्ग
वाहतुकीचा प्रवास नियोजनबद्ध करा – उशीर टाळा
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
घराबाहेर निघण्यापूर्वी पाणी प्या
शक्य असल्यास दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळा
लहान मुलांना उन्हापासून वाचवा
छत्री, टोपी, सनग्लासेसचा वापर करा
भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, आणि फळांचा रस घ्या
सावध राहा – सुरक्षित रहा
उन्हाळ्याची तडाखा टाळा – घराबाहेर पडताना पाणी आणि टोपी/छत्री सोबत ठेवा.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…