महाराष्ट्र

पुण्यात १६ वर्षीय मुलीचा बालविवाह; नातेवाईकांवर गुन्हा दाखल

पुणे : बिबवेवाडी परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन १०९८ कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला.

सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला.

या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम ९, १० आणि ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

12 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

17 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

18 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

18 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

18 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

19 तास ago