महाराष्ट्र

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जविरोधात काँग्रेसचा भाजपावर मोर्चा; राहुल गांधींना दिलेल्या वागणुकीचा निषेध

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी; परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत चर्चा आणि विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्याची मागणी

मुंबई: नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, परीक्षांतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस लाठीचार्जाच्या निषेधार्थ काँग्रेसने मंगळवारी मुंबईत गांधी भवन ते भाजप कार्यालय असा मोर्चा काढला. मात्र, रिगल सिनेमाजवळ पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेस खासदारांना दिलेल्या वागणुकीचाही तीव्र निषेध करण्यात आला. “मोदी हटाव, देश बचाव” आणि “जब जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप केला की, परीक्षांतील अनियमितता आणि पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज आणि राहुल गांधींना दिलेली वागणूक हा केवळ एका नेत्याचा नव्हे, तर देशातील विद्यार्थ्यांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले.

काँग्रेसने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत, परीक्षांतील अनियमिततेवर संसदेत तातडीने चर्चा घ्यावी तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व FIR आणि खटले मागे घ्यावेत, अशी मागणी केली आहे.

या आंदोलनात विजय वडेट्टीवार, नसीम खान, भाई जगताप, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, तुषार गांधी, राजन भोसले, प्रकाश सोनावणे, अभिजीत सपकाळ, अमित कारंडे, राणी अग्रवाल, झिशान अहमद, ब्रिज दत्त, आनंद सिंग यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी सहभागी झाले.

सपकाळ यांनी पुढे सांगितले की, या मुद्द्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

21 मिनिटे ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

25 मिनिटे ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

27 मिनिटे ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

30 मिनिटे ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

35 मिनिटे ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

37 मिनिटे ago