पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी न करता आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खडकवासला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असताना स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारी मांडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या बदलत्या राजकीय भूमिकांमुळे भाजप आणि महायुतीला फायदा होत असून, त्याचा फटका काँग्रेसला बसत असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गटासोबत आघाडी न करता काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्या जातील, असे सपकाळ यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते आपापली भूमिका मांडत असतात. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वर्षे एकत्र लढवल्या आहेत. २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते; मात्र त्यानंतर आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्याची परंपरा कायम राहिली आहे.
“काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एक नॅचरल अलायन्स म्हणून लढत आले आहेत. स्थानिक पातळीवर काही कुरबुरी असू शकतात. पुणे महापालिकेच्या निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर दोघांचा मिळून आकडा वाढला असता, अशी कार्यकर्त्यांची भावना असू शकते,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आघाडीबाबतचे अंतिम आणि धोरणात्मक निर्णय हे वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. स्थानिक तक्रारींचे निवारण प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून केले जाईल. मात्र, भाजपच्या विरोधात राज्य आणि देश पातळीवर महाविकास आघाडी मजबूत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
आगामी जिल्हा परिषदेसह सुमारे २० ते २२ जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे खडकवासल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वबळाची मागणी केली असली तरी आघाडीबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्वच घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गाझियाबाद : वेश्यालयात ग्राहक म्हणून गेलेल्या व्यक्तीवर केवळ पैसे देऊन लैंगिक सेवा घेतल्याच्या आधारावर अनैतिक…
मुंबई : चित्रपट निर्मिती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेऊन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी…
आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोकांना ताणतणावाचा सामना करावा लागतो. ताणतणावामुळे अनेक आजारांचा धोका वाढू शकतो.…
काजू हा चव आणि पौष्टिकतेसाठी ओळखला जातो. यामध्ये व्हिटॅमिन्स, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन असल्याने याचे…
उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. वातावरणातील वाढती उष्णता आणि गरमी यामुळे त्वचेचे अनेक प्रकारे…
मुंबई: पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने उभारण्यासाठी बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवरील आरक्षण रद्द करण्याची…