महाराष्ट्र

भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख विश्वास उटगी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ असतील.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कामगार क्षेत्रावरील संकट, कंत्राटी नोकरभरती, नोटबंदी व जीएसटीचा कृषी आणि उत्पादन क्षेत्रावर झालेला परिणाम, बँकिंग व विमा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच वित्तीय क्षेत्राच्या परदेशीकरणासारख्या गंभीर आर्थिक मुद्द्यांवर या चर्चासत्रात सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून देण्यात आली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

53 मिनिटे ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

56 मिनिटे ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

58 मिनिटे ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

1 तास ago

एनडीए बैठकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा २७ वा वर्धापन दिन ११ जूनला

षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…

1 तास ago

विक्रोळीत अवयवदान जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिघांनी भरले अवयवदान संकल्पपत्र

मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय…

1 तास ago