मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि निरोगी जीवनशैली रुजविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर विशेष जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे. जागतिक नेत्रदान दिन, जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला.
या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उपसचिव अशोक मांडे, राज्य राष्ट्रीय सेवा योजना संपर्क अधिकारी डॉ. मिलिंद काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विद्यापीठांचे NSS संचालक, महाविद्यालयांचे प्राचार्य, कार्यक्रम अधिकारी आणि स्वयंसेवकांसह ६७० हून अधिक प्रतिनिधींनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेत्रदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, नेत्रदान हे मृत्यूनंतरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारे सर्वोच्च दान आहे. १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त सर्व महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये मरणोत्तर नेत्रदानाबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार असून नेत्रतपासणी आणि नेत्रचिकित्सा शिबिरांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या अभियानाद्वारे पर्यावरण संरक्षण, हरित आवरण वाढविणे आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व महाविद्यालयांमध्ये योग मार्गदर्शन, योगाभ्यास शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वृद्धिंगत होत असल्याने विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त…