महाराष्ट्र

मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार; पेन्शनच्या नियमांत मोठे बदल

मुंबई: केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. महिलांना जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार…

आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली आपल्या मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते.

जर एखाद्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल, तर ती आपल्या पतीऐवजी मुलांना पेन्शनसाठी वारस म्हणून नियुक्त करू शकते.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची मोठी घोषणा

मंत्री सिंह म्हणाले, महिलांना त्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे महिलांसमोरच्या आर्थिक अडचणी निश्चितच कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पेन्शन नियमांतील महत्त्वाचे बदल

1) घटस्फोटित किंवा वेगळे राहत असलेल्या महिलांसाठी दिलासा

महिला न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता आपल्या मयत वडिलांच्या पेन्शनवर दावा करू शकते.

जर घटस्फोटाची कार्यवाही पेन्शनधारक जिवंत असतानाच सुरू झाली असेल, तर महिला लाभासाठी पात्र असेल.

2) महिलांच्या मुलांसाठी पेन्शन हक्क

जर महिला पेन्शनधारकाने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल किंवा घरगुती हिंसाचार किंवा हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल केला असेल, तर तिच्या मुलांना पेन्शनसाठी दावेदार किंवा नॉमिनी करता येईल.

3) विधवा महिलांसाठी मोठी सवलत

जर विधवा महिलेनं पुनर्विवाह केला असेल आणि तिचे उत्पन्न किमान पेन्शन मर्यादेपेक्षा कमी असेल, तर तिला तिच्या माजी पतीचे पेन्शन मिळत राहील.

मुलांच्या संगोपनासाठी मिळणार खास सुविधा

सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने रजा घेण्याची मुभा

मुलांसह परदेशात प्रवास करण्याची परवानगी सरकारने दिली.

गर्भपात किंवा मृत बाळाच्या जन्मासाठी महिला कर्मचाऱ्यांना पगारी रजा मिळणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

17 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

17 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

18 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

18 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago