महाराष्ट्र

मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार; पेन्शनच्या नियमांत मोठे बदल

मुंबई: केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. महिलांना जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या नियमानुसार…

आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली आपल्या मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते.

जर एखाद्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल, तर ती आपल्या पतीऐवजी मुलांना पेन्शनसाठी वारस म्हणून नियुक्त करू शकते.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची मोठी घोषणा

मंत्री सिंह म्हणाले, महिलांना त्यांच्या हक्काच्या पेन्शनसाठी संघर्ष करावा लागू नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे महिलांसमोरच्या आर्थिक अडचणी निश्चितच कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

पेन्शन नियमांतील महत्त्वाचे बदल

1) घटस्फोटित किंवा वेगळे राहत असलेल्या महिलांसाठी दिलासा

महिला न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता आपल्या मयत वडिलांच्या पेन्शनवर दावा करू शकते.

जर घटस्फोटाची कार्यवाही पेन्शनधारक जिवंत असतानाच सुरू झाली असेल, तर महिला लाभासाठी पात्र असेल.

2) महिलांच्या मुलांसाठी पेन्शन हक्क

जर महिला पेन्शनधारकाने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल किंवा घरगुती हिंसाचार किंवा हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल केला असेल, तर तिच्या मुलांना पेन्शनसाठी दावेदार किंवा नॉमिनी करता येईल.

3) विधवा महिलांसाठी मोठी सवलत

जर विधवा महिलेनं पुनर्विवाह केला असेल आणि तिचे उत्पन्न किमान पेन्शन मर्यादेपेक्षा कमी असेल, तर तिला तिच्या माजी पतीचे पेन्शन मिळत राहील.

मुलांच्या संगोपनासाठी मिळणार खास सुविधा

सरकारी महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्षांपर्यंत टप्प्याटप्प्याने रजा घेण्याची मुभा

मुलांसह परदेशात प्रवास करण्याची परवानगी सरकारने दिली.

गर्भपात किंवा मृत बाळाच्या जन्मासाठी महिला कर्मचाऱ्यांना पगारी रजा मिळणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

13 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

14 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

14 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

22 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

22 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

22 तास ago