महाराष्ट्र

IVF केंद्रांवर लगाम घालण्यासाठी जिल्हानिहाय समितीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेत महिलांच्या गर्भाशयातील बीजांड (ओव्हम/एग) बेकायदेशीरपणे काढून विक्री केल्या जाणाऱ्या गंभीर प्रकरणावर आज सविस्तर चर्चा झाली. विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधी क्र. ८ अंतर्गत बदलापूर येथील घटनेचा संदर्भ देत हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

चर्चेदरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, इंडियन मेडिकल अससोसिएशन (IMA) तसेच फेडेरेशन ऑफ ओबीसीतेत्रिक अँड जिनाइकॉलॉजिकल सोसायतीएस ऑफ इंडिया (FOGSI) यांच्याकडून PCPNDT कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई केली जाते; मात्र प्रत्यक्षात काही आरोपी डॉक्टर पदवी रद्द होईपर्यंत दुसऱ्या नावाने प्रॅक्टिस करत असल्याचे आढळते. काही प्रकरणांत साक्षीदारांवर दबाव टाकण्याचे प्रकारही घडतात, असे त्यांनी नमूद केले.

आरोग्य व गृह विभागाने मेडिकल कौन्सिलला निर्देश देऊन अशा डॉक्टरांची पदवी तात्काळ रद्द करण्याची कार्यवाही करावी, अन्यथा तपासात हस्तक्षेप होऊन गुन्हेगारी साखळी कायम राहू शकते, असा इशारा डॉ. गोऱ्हे यांनी दिला.

तसेच, मेडिकल टर्मिनशन ऑफ प्रेगनंचय ऍक्ट (MTP) कायद्यानुसार जशी पोलीस अधीक्षक व सिव्हिल सर्जन यांच्या संयुक्त समितीची तरतूद आहे, त्याच धर्तीवर IVF केंद्रांच्या नियमन व देखरेखीसाठी जिल्हानिहाय समिती स्थापन करण्याची ठोस मागणी त्यांनी केली. राज्यस्तरीय समितीत सामाजिक संघटना तसेच दोन्ही सभागृहांतील महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असावा, असेही त्यांनी सुचविले. लायसन्स देणाऱ्या समितीकडेच देखरेखीची जबाबदारी दिल्यास तटस्थता राहील का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

यावर गृहराज्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.बदलापूर प्रकरणात गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून बीजांड काढून विक्री केल्याचे उघड झाल्याने हे प्रकरण महिलांच्या आरोग्य व संभाव्य मानवी तस्करीशी संबंधित असल्याची चिंता व्यक्त होत आहे. राज्य सरकारने IVF केंद्रांवर कठोर नियंत्रण ठेवत तातडीने नियमनाची प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

8 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

8 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

9 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

14 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

14 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

14 तास ago