महाराष्ट्र

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी; महाविकास आघाडीचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेऊन राज्यातील निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, सतेज पाटील, आदित्य ठाकरे, अनिल परब, राजेश टोपे, डॉ. विश्वजीत कदम, धैर्यशील पाटील, अंबादास दानवे, रईस शेख, सचिन सावंत, शिवराज मोरे, संदेश कोंडविलकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, पात्र मतदारांची नावे अन्यायकारकरीत्या वगळली जाणार नाहीत याची खात्री करावी तसेच बनावट व दुबार नोंदींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. ग्रामीण, आदिवासी, स्थलांतरित, वंचित आणि दुर्बल घटकांतील मतदारांना कोणत्याही तांत्रिक कारणामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवले जाऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याची मागणीही करण्यात आली.

यासोबतच मतदान केंद्रांचे नियोजन, मतदान यादीतील त्रुटी दुरुस्ती, बूथ लेव्हल अधिकाऱ्यांचे कामकाज, मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी मिळावी याबाबतही निवडणूक आयोगासमोर विविध मुद्दे मांडण्यात आले. लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यावी, असे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसचा सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला; जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांत सर्व समाजघटकांना संधी

मुंबई: Indian National Congress पक्षाने राज्यभर सुरू असलेल्या “संघटन सृजन अभियान” अंतर्गत जिल्हाध्यक्ष नियुक्त्यांमध्ये व्यापक…

5 तास ago

भाजपचे वर्चस्व किमान २० वर्षे टिकेल; निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचा दावा

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता…

6 तास ago

एलपीजी सबसिडीबाबत नवे नियम; १० लाखांवरील उत्पन्नधारकांना अनुदान बंद

नवी दिल्ली : केंद्र सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानाच्या नियमांमध्ये मोठे बदल करत सबसिडी वितरण…

6 तास ago

होर्मुज खाडीत पुन्हा जहाजांची हालचाल सुरू; जगाला मोठा दिलासा

मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा…

9 तास ago

पावसाच्या दिवसात त्रासदायक ठरते कानात इन्फेक्शनची समस्या

पाऊस आला की, थंड थंड सरींमध्ये भिजण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. लहान मुले असो वा…

9 तास ago

हाय बीपीचा त्रास- कधीही चक्कर येते तर मग रोज या फळाचा रस प्या

वाढतं वय आणि तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते उच्च रक्त दाबाला सायलेंट किलरही म्हणतात.…

9 तास ago