महाराष्ट्र

देवेंद्र! बस नाम ही काफी है; मुख्यमंत्री फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राच्या राजकारणातील बिग डी’ म्हणत फडणवीसांच्या नेतृत्व, बुद्धिमत्ता आणि विकासदृष्टीचे शिंदेंकडून भरभरून कौतुक

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. “देवेंद्र! बस नाम ही काफी है,” असे म्हणत शिंदे यांनी फडणवीस यांना “बुद्धिमान, अभ्यासू, अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आणि विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते” अशी विशेषणे बहाल केली.

शेक्सपिअरच्या “नावात काय आहे?” या प्रसिद्ध उक्तीचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “मी म्हणतो, ‘देवेंद्र! बस नाम ही काफी है!'” तसेच त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील “बिग डी” संबोधत त्यांच्यातील डिव्होशन, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंग या गुणांचा गौरव केला.

फडणवीस हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) नव्हे, तर नैसर्गिक बुद्धिमत्तेवर (NI) विश्वास ठेवणारे नेते असल्याचे सांगत शिंदे यांनी त्यांच्या कायद्यावरील प्रभुत्व, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अथक परिश्रम आणि विकासासाठीचा ठाम निर्धार यांचे विशेष कौतुक केले.”देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. त्यांच्यासारख्या संवेदनशील, निष्कलंक आणि अहोरात्र काम करणाऱ्या नेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” असेही शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त त्यांचे वय नव्हे, तर कर्तृत्व, जनविश्वास आणि कीर्ती अधिक वाढत असल्याचे नमूद करत, त्यांना निरोगी, दीर्घ आणि यशस्वी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली.उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या संदेशातून महायुतीतील समन्वय, परस्पर विश्वास आणि राज्याच्या विकासासाठी दोन्ही नेते एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

1 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

1 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

1 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

1 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

2 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

2 तास ago