महाराष्ट्र

भाषाविषयात हिंदुत्व आणू नका; मराठी भाषा-माणूसच आमचं सर्वोच्च प्राधान्य; राज ठाकरे

मुंबई: भाषाविषयावर आंदोलन करणं हा आजार असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करत “भाषेच्या प्रश्नात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न करू नका,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी भाषेबाबत आग्रही भूमिका घेणं आणि आंदोलन करणं हा आजार असल्याचं विधान केलं होतं. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये भागवतांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, “भाषावार प्रांतरचना का झाली याचा इतिहास भागवतांना माहीत असायलाच हवा. भाषेप्रती आणि प्रांताप्रती असलेलं प्रेम जर आजार असेल, तर हा आजार देशातील बहुसंख्य राज्यांत आहे.” दक्षिण भारतापासून पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरातपर्यंत भाषिक अस्मिता तीव्र असल्याचं त्यांनी नमूद केलं.

परप्रांतीयांकडून स्थानिक भाषा व संस्कृतीचा अवमान केला जातो, तेव्हा स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण होतो आणि त्यातून उद्रेक होतो. “यालाच आजार म्हणायचं का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश व बिहारमधील लोकांविरोधात झालेल्या घटनांवेळी समरसतेचे धडे का दिले गेले नाहीत, असा थेट प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.

भाजप आणि संघावर अप्रत्यक्ष राजकारण करत असल्याचा आरोप करताना राज ठाकरे म्हणाले, “स्वतःला अराजकीय म्हणवणाऱ्या संघाने या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल, तर हिंदी लादणाऱ्या सरकारला आधी जाब विचारा.”

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “हिंदूंवर हल्ला झाला तर आम्ही हिंदू म्हणून उभे राहूच. पण हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या तमाशावर, कावड यात्रांमधील बिभत्स प्रकारांवर, गोहत्येच्या राजकारणावर तुम्ही कधी बोलणार?” असा सवाल त्यांनी भागवतांना केला.

शेवटी राज ठाकरे यांनी ठामपणे सांगितले की, “मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच आमचं अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे. भाषिक आणि प्रांतिक अस्मिता महाराष्ट्रात कायम राहणारच. हे आमचं स्वत्व आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र गरज पडेल तेव्हा त्वेषाने उभा राहील.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

11 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

14 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

16 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago