महाराष्ट्र

नायगाव बीडीडीवासीयांचे स्वप्न साकार; ८६४ घरांचे वितरण

मुंबई: नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचे वितरण उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्यांचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते.

या सोहळ्यामुळे बीडीडी चाळीत राहणाऱ्या नागरिकांचे ‘स्वतःचे घर’ हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले असून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विशेष उल्लेखनीय होता. यावेळी बोलताना शिंदे यांनी सांगितले की, चाळ संस्कृतीतून टॉवरमध्ये जाण्याचा हा बदल अनेक कुटुंबांसाठी आयुष्य बदलणारा ठरणार आहे.

ते पुढे म्हणाले की, या प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात झाली होती. सरकार बदलामुळे काही काळ कामाची गती मंदावली, मात्र २०२२ नंतर पुन्हा प्रकल्पाला वेग देण्यात आला. अल्पावधीत महत्त्वाचे निर्णय घेत पोलिसांसाठीही सवलतीत घरे उपलब्ध करून देण्यात आली.

बीडीडी चाळींना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. स्वातंत्र्य चळवळ, गिरणी कामगारांचा सुवर्णकाळ आणि विविध सामाजिक चळवळींच्या त्या साक्षीदार आहेत. अनेक पिढ्या या चाळीत राहिल्या असून, मर्यादित जागेत जीवन जगण्याच्या अडचणी लक्षात घेऊनच पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“घर हे केवळ निवारा नसून आत्मसन्मान, सुख-समृद्धी आणि स्थैर्याचा पाया आहे,” असे सांगत शिंदे यांनी महायुती सरकार सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.यावेळी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना शुभेच्छा देत, “यंदाची गुढी तुम्ही नवीन घरात उभाराल, हीच खरी आनंदाची बाब आहे,” असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. नीलम गोऱ्हे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

1 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

1 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

6 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

6 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

6 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

6 तास ago