महाराष्ट्र

पुण्यात पोलीस, पत्रकारांच्या सतर्कतेनेमुळे वाचले आईसह दोन चिमुकल्यांचे प्राण…

पुणे: कौटुंबिक भांडण आणि दारुडा नवऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून खडकवासला धरण चौपाटीवर स्वतःच्या दोन मुलांसह आत्महत्या करण्यासाठी आलेल्या एका युवतीचे प्राण धरणावरील एका व्यवसायिक महिलेच्या, पोलिस आणि पत्रकाराच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.

महिलेला पोलीस ठाण्यात आणून तिच्या नवऱ्यास समज देऊन पाठवण्यात आले. धरण चौकातील वाहतूक पोलीस आणि पत्रकाराने तात्काळ घटनास्थळी पोहोचून युवतीस आत्महत्या करण्यापासून परावर्तीत केले.

सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान खडकवासला धरण चौकातील पुणे ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक पोलीस विलास बांबळे वाहतूक नियंत्रित करत होते तर स्थानिक पत्रकार विशाल भालेराव नेहमीप्रमाणे या रस्त्याने प्रवास करत होते.

धरण चौपाटीवर स्टॉल धारक रंजना जाधव, काजल बडदे यांची स्टॉल लावून ग्राहकांच्या ऑर्डर देण्याची लगबग चालू असताना काजल बडदे या स्टॉलधारक महिलेचा पोलिसांना फोन आला. एक युवती आपल्या लहानग्यांच्या हाताला दोरी बांधून आत्महत्या करत आहे. त्यानंतर माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

30 वर्षाची युवती तिच्या सात वर्षाची गोंडस मुलगी तर कडेवर असलेले एक वर्षांचे बाळ यांसह आत्महत्या करण्याच्या तयारीने आली होती. घरात झालेल्या भांडणामुळे हा टोकाचा पाऊल उचलत असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी नागरीक पोलीस आणि पत्रकार यांनी सदर युवतीशी संपर्क साधत आवाहन करुन आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान शंभर नंबरहून पोलिसांनाही संपर्क साधण्यात आला असल्याने पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेसह दोन चिमुकल्यांचा जीव वाचला. “कुटुंबात झालेल्या वादातून महिला टोकाचे पाउल उचलत आहेत. हे सामाजिक मागासलेपणाचे लक्षण आहे. महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास आणि स्वावलंबी झाल्यास अशा घटना कमी होतील. घडलेल्या वादातून आत्महत्या करणे हा अंतिम उपाय नाही. असे मत हवेली पोलीस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शीतल ठेंबे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या…

9 तास ago

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

10 तास ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

10 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

11 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

11 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

15 तास ago