महाराष्ट्र

दादांच्या आवाजातील बनावट एआय क्लिप्स प्रकरण; जबाबदारांवर कडक कारवाई करणार; सुनील तटकरे

मुंबई: आदरणीय दादांच्या आवाजात खोटी व दिशाभूल करणारी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हे कृत्य अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा असून, संबंधितांनी अशा एआय-निर्मित (AI-generated) बनावट क्लिप्सचे वितरण त्वरित थांबवावे, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिला आहे.

तटकरे यांनी स्पष्ट केले की, काही स्वार्थी प्रवृत्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या नावाचा आणि आवाजाचा गैरवापर करत आहेत. महाराष्ट्रातील जनतेमध्ये दादांबद्दल प्रचंड आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.

मृत नेत्याच्या प्रतिमेचा अशा प्रकारे वापर करणे हे अत्यंत नीच आणि निंदनीय कृत्य असून, दोषींवर सायबर कायदे तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहनही तटकरे यांनी नागरिकांना केले आहे.

दिवंगत अजितदादा पवार हे राज्यातील लोकप्रिय नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने खोटा प्रचार करणे हे सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त केला आहे. संबंधितांनी हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

21 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

21 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

21 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

21 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

23 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

23 तास ago