संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत
शेतीत कायमस्वरूपी सिंचन सुविधा
शेतीचे उत्पन्न वाढवणे.
अनुदान घटक व रक्कम
नवीन विहीर – ₹4,00,000
जुनी विहीर दुरुस्ती – ₹1,00,000
इनवेल बोअरिंग – ₹40,000
वीज जोडणी – ₹20,000
पंप संच – ₹40,000
सोलर पंप – ₹50,000
शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण – ₹2,00,000
ठिबक सिंचन – ₹97,000
तुषार सिंचन – ₹47,000
PVC/HDPE पाईप – ₹50,000
परसबाग – ₹5,000
बैल/ट्रॅक्टर यंत्रसामग्री – ₹50,000 पर्यंत
पात्रता निकष
शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध असावा
७/१२ आणि ८अ उतारा आवश्यक
जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते (आधार लिंक)
दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य
0.40 ते 6 हेक्टर शेती (विशेष बाबतीत अट लागू नाही)
एकदा लाभ घेतल्यावर 5 वर्षे पुन्हा लाभ नाही
जुनी विहीर असल्यास 20 वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक (आधार लिंक)
शेतकरी ओळख प्रमाणपत्र
शेतकऱ्याचा फोटो
जमीन नकाशा (हवे असल्यास)
संयुक्त करारपत्र (लहान जमीन असल्यास)
स्वयंघोषणा पत्र (जर इतर योजनांचा लाभ घेतला नसेल)
शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…
पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…