संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे.
योजनेचा उद्देश
अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत
शेतीत कायमस्वरूपी सिंचन सुविधा
शेतीचे उत्पन्न वाढवणे.
अनुदान घटक व रक्कम
नवीन विहीर – ₹4,00,000
जुनी विहीर दुरुस्ती – ₹1,00,000
इनवेल बोअरिंग – ₹40,000
वीज जोडणी – ₹20,000
पंप संच – ₹40,000
सोलर पंप – ₹50,000
शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण – ₹2,00,000
ठिबक सिंचन – ₹97,000
तुषार सिंचन – ₹47,000
PVC/HDPE पाईप – ₹50,000
परसबाग – ₹5,000
बैल/ट्रॅक्टर यंत्रसामग्री – ₹50,000 पर्यंत
पात्रता निकष
शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध असावा
७/१२ आणि ८अ उतारा आवश्यक
जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते (आधार लिंक)
दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य
0.40 ते 6 हेक्टर शेती (विशेष बाबतीत अट लागू नाही)
एकदा लाभ घेतल्यावर 5 वर्षे पुन्हा लाभ नाही
जुनी विहीर असल्यास 20 वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक (आधार लिंक)
शेतकरी ओळख प्रमाणपत्र
शेतकऱ्याचा फोटो
जमीन नकाशा (हवे असल्यास)
संयुक्त करारपत्र (लहान जमीन असल्यास)
स्वयंघोषणा पत्र (जर इतर योजनांचा लाभ घेतला नसेल)
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…