शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

महाराष्ट्र

संभाजीनगर: राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी ४ लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ०.४० हेक्टरपासून ते ६ हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर, वीजजोडणी, पंपसंच, शेततळे, सोलरपंप, ठिबक सिंचन यांसारख्या सुविधा मिळणार आहे.

योजनेचा उद्देश

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना आर्थिक मदत

शेतीत कायमस्वरूपी सिंचन सुविधा

शेतीचे उत्पन्न वाढवणे.

अनुदान घटक व रक्कम

नवीन विहीर – ₹4,00,000

जुनी विहीर दुरुस्ती – ₹1,00,000

इनवेल बोअरिंग – ₹40,000

वीज जोडणी – ₹20,000

पंप संच – ₹40,000

सोलर पंप – ₹50,000

शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण – ₹2,00,000

ठिबक सिंचन – ₹97,000

तुषार सिंचन – ₹47,000

PVC/HDPE पाईप – ₹50,000

परसबाग – ₹5,000

बैल/ट्रॅक्टर यंत्रसामग्री – ₹50,000 पर्यंत

पात्रता निकष

शेतकरी अनुसूचित जाती / नवबौद्ध असावा

७/१२ आणि ८अ उतारा आवश्यक

जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते (आधार लिंक)

दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य

0.40 ते 6 हेक्टर शेती (विशेष बाबतीत अट लागू नाही)

एकदा लाभ घेतल्यावर 5 वर्षे पुन्हा लाभ नाही

जुनी विहीर असल्यास 20 वर्षांनंतरच दुरुस्तीचे अनुदान मिळेल

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

बँक पासबुक (आधार लिंक)

शेतकरी ओळख प्रमाणपत्र

शेतकऱ्याचा फोटो

जमीन नकाशा (हवे असल्यास)

संयुक्त करारपत्र (लहान जमीन असल्यास)

स्वयंघोषणा पत्र (जर इतर योजनांचा लाभ घेतला नसेल)