महाराष्ट्र

मोदी सरकारला पहिला धक्का? चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात…

नवी दिल्ली: मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

एकीकडे राहुल गांधींनी विरोधकांच्या इंडिया आघाडीची पुन्हा एकदा मोट बांधत ‘वोटचोरी’ कॅम्पेनद्वारे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत भाजपची झोप उडवली आहे. तर दुसरीकडे मोदी सरकारबाबत मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत राहुल गांधी यांच्या संपर्कात असल्याचा सनसनाटी दावा वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी केला आहे.या त्यांच्या दाव्यामुळे दिल्लीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी रेड्डी यांच्या दाव्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या गोटात काही प्रमाणात अस्वस्थता पसरण्याची शक्यता आहे.

यावेळी माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करताना आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमधील मतदानातील तफावतीविषयी चर्चा न केल्याबद्दल घणाघाती टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी अरविंद केजरीवाल यांच्याविषयी का बोलत नाही? कारण ते तर आमदारकीची निवडणूक हरले असल्याचं त्यांनी म्हटलं.

याचवेळी जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आंध्र प्रदेशबद्दल चकार शब्द काढत नसल्याचा गंभीर आरोपही केला. तसेच राहुल गांधींविषयी आपण काय बोलावे, जे स्वतः प्रामाणिक नाहीत असा हल्लाबोल त्यांनी केला..यामागे चंद्राबाबू तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यामार्फत हॉटलाइनद्वारे त्यांच्याशी संपर्कात असल्याचा दावाही रेड्डी यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 तास ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

18 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

23 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

23 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

23 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

23 तास ago