महाराष्ट्र

अखेर मुंडे-कराड यांना नको असलेल्या डॅशिंग अधिकाऱ्याची बीडमध्ये एन्ट्री

बीड: बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे कुटुंबाची मागणी मान्य केली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरूवारी (ता.31) मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भाजप आमदार सुरेश धसही त्यांच्याबरोबर उपस्थित होते. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड व त्याचा मुलगाही सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे.

शिवाय या हत्ये प्रकरणी अद्याप एकाही गुन्हेगाराला अटक करण्यात आलेली नाही. नुकतंच आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होत. त्यानंतर काल ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर या प्रकरणात कुणीही असले तरी त्याला सोडणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. शिवाय मुख्यमंत्र्यांनी तत्काळ एसआयटी स्थापन करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अमरावतीचे अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक संतोष साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सपकाळ यांचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाच्या सुरुवातीपासूनच स्थानिक पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता. अशातच ज्ञानेश्वरी मुंडेंनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून परळीतील धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून पोलिसांना फोन गेल्यानंतर हा तपास थांबवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के काही पोलिस अधिकारी सहभागी असून त्यांची नावे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. शिवाय या पोलिसांचे फोन आणि कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी आम्ही केल्याचंही धस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांची पदोन्नती झाली होती, पण महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांची बदली करण्यात आली. ते असते तर असे प्रकार घडले नसते,” असंही धस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केल्याने या प्रकरणाचा तपास वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…

4 मिनिटे ago

‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत 'छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर'चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ…

11 मिनिटे ago

MHT-CET कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; रोहित पवार

CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन; विद्यार्थ्यांना न्यायाची मागणी मुंबई:…

19 मिनिटे ago

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतुल्य नेतृत्वाला विनम्र अभिवादन

मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव…

22 मिनिटे ago

एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढली; आता १ सप्टेंबरपर्यंत मिळणार अतिरिक्त वेळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC)…

26 मिनिटे ago

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

4 तास ago