बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत, आणि या दुःखद घटनेचा राजकारणावरही प्रभाव जाणवत आहे.
अजितदादांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र अजितदादांच्या पक्षातील काही वरिष्ठ नेते या विलीनीकरणास अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, पवार कुटुंबात अजितदादांचे पुत्र पार्थ पवार शरद पवार आणि रोहित पवार यांच्यासोबत उपस्थित दिसले आहेत.
या पार्श्वभूमीवर खासदार सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाचे आवाहन केले आहे. तटकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय झाला तरी कोणताही सार्वजनिक आनंदोत्सव साजरा करू नये.
ते म्हणाले, “महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकांचे मतदान शांततेत पार पडले आहे. आपण सर्वांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल आणि दाखवलेल्या शिस्तीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. अजितदादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम, शिस्त आणि साधेपणा राखणे.”
तटकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की, ९ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर विजय सोहळे, मिरवणुका, रोड शो, फटाके किंवा कोणताही सार्वजनिक जल्लोष टाळावा. “दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम आणि साधेपणा राखणे,” असे त्यांनी नम्रपणे सांगितले आहे.
शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…
शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…