बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेटटी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोपनीय सूत्रांकडून जळोची रस्त्यावर दोन टाक्या कुलूपबंद अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत टाक्यांची कुलूपे उघडली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवलेला आढळून आला.पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येकी एक किलो वजनाच्या सुमारे ४७० पॅकेटमध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता. विक्रीसाठीच हा साठा आणण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नाकाबंदीमुळे तस्करांचा डाव फसला?
बारामती शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कडक नाकाबंदीमुळे तस्करांनी माल तेथेच टाकून पळ काढल्याची शक्यता अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी व्यक्त केली. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीचा अंदाज घेत हा साठा विक्रीसाठी आणला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
तस्करांचा शोध सुरू
बारामतीत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्याने अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित तस्करांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बिरादार आणि राठोड यांनी सांगितले.या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…