बारामती: बारामती शहरात अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत शहर पोलिसांनी जळोची पिंपळी रस्त्यालगतच्या शेतात दोन टाक्यांमध्ये लपवून ठेवलेला तब्बल ४७० किलो गांजा शनिवारी (ता. २८) जप्त केला. बाजारभावानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपये असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड तसेच पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेटटी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गोपनीय सूत्रांकडून जळोची रस्त्यावर दोन टाक्या कुलूपबंद अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी धाव घेत टाक्यांची कुलूपे उघडली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवलेला आढळून आला.पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येकी एक किलो वजनाच्या सुमारे ४७० पॅकेटमध्ये हा गांजा पॅक करण्यात आला होता. विक्रीसाठीच हा साठा आणण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नाकाबंदीमुळे तस्करांचा डाव फसला?
बारामती शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कडक नाकाबंदीमुळे तस्करांनी माल तेथेच टाकून पळ काढल्याची शक्यता अतिरिक्त पोलिस अधीक्षक बिरादार यांनी व्यक्त केली. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या मागणीचा अंदाज घेत हा साठा विक्रीसाठी आणला असावा, असा पोलिसांचा संशय आहे.
तस्करांचा शोध सुरू
बारामतीत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त झाल्याने अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीसीटीव्ही फूटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित तस्करांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे बिरादार आणि राठोड यांनी सांगितले.या कारवाईमुळे बारामतीत खळबळ उडाली असून, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…