महाराष्ट्र

मालेगाव वादावरून राज्यात तणाव! देवेंद्र फडणवीस यांचा स्पष्ट इशारा; अधिकृत भूमिका माझीच

मुंबई: मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांनी लावलेल्या टिपू सुलतान यांच्या फोटोवरून सुरू झालेला वाद आता अधिकच पेटला आहे. महापालिकेतील दालनात नमाज पठण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जाऊन हनुमान चालिसा पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

दरम्यान, भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मदरशांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले. “राज्यातील काही मदरशांत दहशतवादी तयार होतात, सर्व मदरसे बंद करू,” अशा आशयाचे विधान त्यांनी केले होते. तसेच मालेगाव प्रकरणावर भाष्य करताना “नमाज पठणासाठी मशिदी कमी पडतात का?” असा सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजासह विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत प्रतिक्रिया देताना, “आता बस्स झालं हिंदू-मुस्लिम; राज्यात इतरही गंभीर प्रश्न आहेत,” असे म्हटले होते.

दरम्यान, “नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांना मुख्यमंत्री अभय देतात का?” असा सवाल उपस्थित होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भूमिका स्पष्ट केली. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले की, “मी पक्षाचा सर्वोच्च नेता असून माझी जी भूमिका आहे, तीच भाजपची अधिकृत भूमिका असते. इतर कोणी काही बोलले, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असते.”

नितेश राणे यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “कधी कधी ते बोलताना काही गोष्टी जास्त बोलून जातात. अशा वेळी त्यांना सांगितले जाते की, अशी विधानं टाळावीत.” मात्र मदरशांबाबत केलेल्या विधानांचा संदर्भ त्या काळातील परिस्थितीशी जोडला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी बाहेरून निधी येत असल्याची माहिती आणि काही शिकवणुकींवर आक्षेप असल्याच्या पार्श्वभूमीवर ते वक्तव्य झाले असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.मालेगावमधील घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

51 मिनिटे ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

7 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

7 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

7 तास ago