महाराष्ट्र

सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात; मीरा भाईंदर जमीन प्रकरणावरून सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघात

नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यावर राज्य सरकारने घेतलेली भूमिका ही जनतेच्या डोळ्यात धूळ फेकणारी असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केला. कोट्यवधी रुपयांची सरकारी जमीन खासगी विकासकांच्या घशात घालण्यासाठी प्रशासकीय स्तरावर जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी नागपुरात केला.

वडेट्टीवार म्हणाले की, मीरा भाईंदरची ही जमीन मूळची राज्य शासनाची असताना शासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अभिलेखात बदल करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते, तरीही वरिष्ठ स्तरावर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ रोजी केंद्र सरकारचे अपील फेटाळून जमीन ‘मीरा सॉल्ट वर्क्स’च्या मालकीची असल्याचे मान्य केले. सुनावणी अधिकारक्षेत्राच्या मुद्द्यावर सुरू असताना मालकी हक्काबाबत निर्णय खासगी कंपनीच्या बाजूने लागणे हे सरकारी वकिलांच्या आणि विधी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याची टीका त्यांनी केली. “सरकारी वकील झोपले होते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असताना सरकारी जमिनी खासगी बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले की, आता टीका झाल्यानंतर सरकारला जाग आली असून सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली जात आहे. उच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत शासन काय करत होते? खासगी विकासकांचे हित जपण्यासाठीच ही प्रक्रिया लांबवली गेली का? असा सवाल त्यांनी केला.

ही २५४ एकर जमीन जनतेची संपत्ती असून ती खासगी विकासकांच्या हवाली होणे म्हणजे राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान असल्याचे त्यांनी म्हटले. मिठागराच्या जमिनींबाबत पुरावे असूनही न्यायालयात भक्कम भूमिका मांडण्यात शासन अपयशी ठरल्याने जमीन गमवावी लागल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी वेळकाढूपणा केल्यास आम्हीही न्यायालयात जाऊ, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar) पक्षाचे प्रवक्ते Vikas Lavande यांच्यावर आळंदीत झालेल्या शाईफेक प्रकरणाचाही वडेट्टीवार यांनी निषेध केला. वारकरी संप्रदायात हिंसक प्रवृत्तींची घुसखोरी झाल्याचा आरोप करत या भ्याड हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

13 मिनिटे ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

26 मिनिटे ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

30 मिनिटे ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

2 तास ago

शिरूरमध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच महिलेचा जीव गेल्याचा गंभीर आरोप…

शिरूर: शिरूर शहरातील बाबुरानगर येथील एका खासगी रुग्णालयात हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया सुरू असताना एका विवाहित…

2 तास ago

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली:…

16 तास ago