नवी दिल्ली: पंतप्रधान Narendra Modi यांचा करिष्मा आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची चाणक्य नीति पश्चिम बंगालमध्ये यशस्वी ठरली असून जनतेने विकास, विश्वास आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेला कौल दिला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केली.
शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील विजय हा कार्यकर्त्यांच्या अथक मेहनतीचा आणि एनडीएच्या प्रभावी रणनीतीचा परिणाम आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच पश्चिम बंगालमध्ये एनडीएला मोठे यश मिळत असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “पश्चिम बंगालमध्ये भय आणि भरोसा अशी लढाई होती. जनतेने भयाला नाकारत भरोशाला स्वीकारले. मोदीजींनी विकसित भारताचे स्वप्न जनतेसमोर ठेवले आणि देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. त्या भूमिकेवर जनतेने विश्वास दाखवला आहे.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून अमित शाह यांनी पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला. त्यांनी पुन्हा एकदा स्वतःला आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून सिद्ध केले आहे.”
डबल इंजिन सरकारमुळे पश्चिम बंगालमध्ये विकासाला वेग मिळेल, असा विश्वास व्यक्त करत शिंदे म्हणाले की, “उद्योग, रोजगार, पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीच्या बाबतीत पश्चिम बंगाल आता नव्या दिशेने पुढे जाईल. राज्यातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, नवीन कंपन्या येतील आणि विकासाचा मुख्य प्रवाह अधिक मजबूत होईल.”
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “जनतेने राष्ट्रहित आणि विकासाला पसंती दिली असून भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गुंडाराजाच्या राजकारणाला नाकारले आहे. मोदीजींचे ‘नेशन फर्स्ट’ धोरण जनतेला मान्य झाले आहे,” असे शिंदे म्हणाले.
पश्चिम बंगालमधील भाजप नेते Suvendu Adhikari तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या संघर्षाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. “दहशतीसमोर न झुकता कार्यकर्त्यांनी सातत्याने संघर्ष केला. अनेकांनी लाठ्या-काठ्यांचा सामना केला, पण ते मागे हटले नाहीत. त्या मेहनतीमुळेच आजचा विजय दिसत आहे,” असेही त्यांनी सांगितले.
मोड आलेली कडधान्यं रोज खाण्याची सवय हेल्थी फॅशन म्हणून रूढ होते आहे, पण कोणतीही गोष्ट…
चांगल्या झोपेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो. झोप कमी पडणे आणि यामुळे…
मुंबई: राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या “भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा” धोरणावरून राज्यात नव्या वादाला तोंड…
नागपूर: मीरा भाईंदर येथील मौजे भाईंदरमधील सुमारे २५४.८८ एकर शासकीय जमिनीच्या मालकी हक्काबाबत उच्च न्यायालयाने दिलेला…
दह्यात दालचिनी पावडर टाकून, त्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात; विशेषत: महिलांसाठी. तज्ज्ञ…
हळद हा भारतीय घरात वापरला जाणाऱ्या मुख्य पदार्थांपैकी एक आहे. हळदीचा वापर फक्त स्वयंपाक घरात…