महाराष्ट्र

धर्म स्वातंत्र्य विधेयकावर विधानसभेत जोरदार चर्चा; जितेंद्र आव्हाडांचा विरोध, शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई: राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य (Freedom of Religion) विधेयकावर विधानसभेत सोमवारी जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाचा हेतू सभागृहात स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने विरोध दर्शवला.

चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत तीव्र विरोध नोंदवला. “जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध आहे; मात्र ‘धर्म स्वातंत्र्य’ या नावाने विधेयक आणणे म्हणजे संविधानाच्या तत्त्वांना छेद देणे आहे,” असे ते म्हणाले. धर्मांतराच्या इतिहासाचा उल्लेख करत त्यांनी गौतम बुद्ध , जैन आणि बसवेश्वर यांचाही संदर्भ दिला.

आव्हाड यांनी आपल्या भाषणात सामाजिक भेदभाव आणि जातिव्यवस्थेवरही भाष्य केले. B. R. Ambedkar यांना शाळेत बसू दिले जात नव्हते, पण त्यांनी पुढे जाऊन देशाला संविधान दिले, असे उदाहरण देत त्यांनी समाजातील बदलाची गरज अधोरेखित केली. तसेच, जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आंतरधर्मीय विवाहाचे उदाहरण देताना “मी माझ्या मुलीचे लग्न ख्रिश्चन कुटुंबात केले,” असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार योगेश सागर यांनी या वक्तव्याबाबत माफीची मागणी केली. भाजप आमदार वेलमध्ये उतरल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले. त्यावर “जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगत आव्हाड यांनी माफी मागितली. त्यानंतर अध्यक्षांनी संबंधित वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 मिनिटे ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

10 मिनिटे ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

14 मिनिटे ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

17 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

17 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

17 तास ago