महाराष्ट्र

धर्म स्वातंत्र्य विधेयकावर विधानसभेत जोरदार चर्चा; जितेंद्र आव्हाडांचा विरोध, शिवसेनेचा पाठिंबा

मुंबई: राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य (Freedom of Religion) विधेयकावर विधानसभेत सोमवारी जोरदार चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकाचा हेतू सभागृहात स्पष्ट केल्यानंतर विरोधकांनी आपापल्या भूमिका मांडल्या. या विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने विरोध दर्शवला.

चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत तीव्र विरोध नोंदवला. “जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध आहे; मात्र ‘धर्म स्वातंत्र्य’ या नावाने विधेयक आणणे म्हणजे संविधानाच्या तत्त्वांना छेद देणे आहे,” असे ते म्हणाले. धर्मांतराच्या इतिहासाचा उल्लेख करत त्यांनी गौतम बुद्ध , जैन आणि बसवेश्वर यांचाही संदर्भ दिला.

आव्हाड यांनी आपल्या भाषणात सामाजिक भेदभाव आणि जातिव्यवस्थेवरही भाष्य केले. B. R. Ambedkar यांना शाळेत बसू दिले जात नव्हते, पण त्यांनी पुढे जाऊन देशाला संविधान दिले, असे उदाहरण देत त्यांनी समाजातील बदलाची गरज अधोरेखित केली. तसेच, जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आंतरधर्मीय विवाहाचे उदाहरण देताना “मी माझ्या मुलीचे लग्न ख्रिश्चन कुटुंबात केले,” असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख करताना आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. मंत्री शंभूराजे देसाई आणि आमदार योगेश सागर यांनी या वक्तव्याबाबत माफीची मागणी केली. भाजप आमदार वेलमध्ये उतरल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला आणि बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.

यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नारवेकर यांनी आव्हाड यांना दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले. त्यावर “जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगत आव्हाड यांनी माफी मागितली. त्यानंतर अध्यक्षांनी संबंधित वक्तव्य कामकाजातून वगळण्याचे निर्देश दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

19 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

2 दिवस ago