महाराष्ट्र

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान; महाराष्ट्रात शरद पवार, रामदास आठवले यांच्यासह ७ जण बिनविरोध.

नवी दिल्ली: देशातील १० राज्यांमधील रिक्त असलेल्या ३७ राज्यसभा जागांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यापैकी २६ जागांवर उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली होती, तर उर्वरित ११ जागांसाठी मतदान घेण्यात आले.

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये समझोता झाल्यामुळे सातही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट), विनोद तावडे (भाजप) आणि रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले गट) यांचा समावेश आहे.दरम्यान, बिहारमध्ये पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर एनडीएच्या उमेदवारांनी बाजी मारत विजय मिळवला.

राज्यनिहाय विजेते उमेदवार

महाराष्ट्र (७ जागा – सर्व बिनविरोध)

शरद पवार (NCP-SP)

विनोद तावडे (भाजप)

रामदास आठवले (RPI-A)

बिहार (५ जागा – एनडीएचा विजय)

नितीश कुमार (JDU)

रामनाथ ठाकूर (JDU)

नितीन नबीन (भाजप)

शिवेश कुमार (भाजप)

उपेंद्र कुशवाहा (RLM)

पश्चिम बंगाल (५ जागा)

बाबुल सुप्रियो (TMC)

राजीव कुमार (TMC)

मेनका गुरुस्वामी (TMC)

कोयल मलिक (TMC)

राहुल सिन्हा (भाजप)

इतर राज्यांतील महत्त्वाचे निकाल

तेलंगणा: अभिषेक मनु सिंघवी (काँग्रेस), वेम नरेंद्र रेड्डी (काँग्रेस)

हिमाचल प्रदेश: अनुराग शर्मा (काँग्रेस)

छत्तीसगड: लक्ष्मी वर्मा (भाजप), फुलो देवी नेताम (काँग्रेस)

ओडिशा: मनमोहन सामल (भाजप), सुजीत कुमार (भाजप), दिलीप राय (अपक्ष – भाजप पुरस्कृत), संतृप्त मिश्रा (BJD)

यंदाच्या निवडणुकीत ओडिशामध्ये दिलीप राय यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत सत्ताधारी बीजेडीच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. तर बिहारमध्ये आरजेडीचे अमरेंद्र धारी सिंह आणि एनडीएचे उपेंद्र कुशवाहा यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत झाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

12 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

20 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

21 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

22 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 दिवस ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 दिवस ago