महाराष्ट्र

राज्य व विभागीय अधिस्वीकृती समित्यांविरुद्ध १२ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार

औरंगाबाद: महाराष्ट्र शासनाने दिनांक ११ जुलै २०२३ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय अधिस्वीकृती समिती तसेच नऊ विभागीय अधिस्वीकृती समित्यांची बेकायदेशीर व मनमानीपणे स्थापना करण्यात आली होती. या समित्यांच्या स्थापनेला आव्हान देत प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिका क्र. 10070/2023 वर ऑगस्ट व सप्टेंबर २०२३ मध्ये दोन वेळा प्राथमिक सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने याचिका ग्राह्य धरून नोंदणी केली होती, मात्र पुढील सुनावणी अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवण्यात आली होती. दरम्यान, प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने वर्ष २०२५ मध्ये ॲड. रूपेशकुमार बोरा व ॲड. एस. ए. पठाण यांच्यामार्फत सिव्हिल ॲप्लिकेशन क्र. 902/2025 दाखल करून संबंधित याचिकेवरील सुनावणी लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती.

या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आला आहे की, वरील अधिस्वीकृती समित्यांची स्थापना भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारी असून, ती पत्रकार व त्यांच्या संघटनांवर अन्याय करणारी आहे. याचिकेद्वारे असा आरोपही करण्यात आला आहे की, शासनाने अधिस्वीकृती प्रक्रियेतील स्वायत्तता व पारदर्शकतेचा भंग करत, प्रशासनाच्या अधिपत्याखालील अपात्र व मनमानीरित्या नियुक्त केलेल्या सदस्यांचा समावेश करून समित्या स्थापन केल्या आहेत, ज्या माध्यम स्वातंत्र्याच्या तत्त्वांशी विसंगत आहेत.

या प्रकरणी दिनांक १ जुलै २०२५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात माननीय न्यायमूर्ती श्री. मनिष पितळे आणि माननीय न्यायमूर्ती श्री. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्या संस्थेच्यावतीने ॲड. रूपेशकुमार बोरा यांनी युक्तिवाद मांडला. न्यायालयाने युक्तिवाद ग्राह्य धरून याचिकेत अंतिम सुनावणी घेण्यासाठी १२ ऑगस्ट २०२५ ही तारीख निश्चित करत आदेश पारित केला आहे.

या प्रकरणातील अंतिम निर्णय माध्यम स्वातंत्र्य, पत्रकारांची स्वायत्तता तसेच शासन नियंत्रणाच्या मर्यादांबाबत एक दिशादर्शक आणि ऐतिहासिक ठरू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. संबंधित याचिकेतील मुद्दे आणि न्यायालयाची भूमिका याकडे संपूर्ण राज्यातील प्रसारमाध्यमांचे, संपादक संघटनांचे तसेच कायदेविषयक क्षेत्रातील अभ्यासकांचे लक्ष लागून राहिले आहे.

राज्यातील पात्र पत्रकार व संबंधित संघटनांना या खटल्याच्या माध्यमातून न्यायालयाकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

10 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

16 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

16 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

16 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

16 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago