महाराष्ट्र

खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट

अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अमरावती: शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सत्तालालसेवर घणाघाती प्रहार केला. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचा स्पष्ट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आदेश दिले.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेचे पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अमरावतीत थेट रणशिंग फुंकले. नेहरू मैदानावर झालेल्या जाहीर प्रचारसभेत त्यांनी विकास, महिला सशक्तीकरण, मूलभूत सुविधांचा अभाव आणि विरोधकांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल करत, “जे बोलतो ते करतो, कमी बोलतो पण जास्त काम करतो,” असा ठाम विश्वास मतदारांना दिला.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील नेहरू मैदानावर शिवसेनेची जाहीर प्रचारसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला लाडक्या बहिणीचा लाडक्या भावांची विशेष गर्दी होती. संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या विकासासाठी ठोस रोडमॅप मांडत, येत्या १५ तारखेला धनुष्यबाणासमोरील बटण दाबण्याचे आवाहन केले.

“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हा तुमच्या भावाचा शब्द आहे,” असे ठाम सांगत त्यांनी विरोधकांवर टीका केली. कोर्टात अडथळे आणले गेले तरी महिलांच्या ताकदीमुळेच महायुतीला प्रचंड यश मिळाले, असे त्यांनी नमूद केले.

“महिलांचा पाठिंबा म्हणजे विजयाची खात्री,” असे सांगत नगरपरिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांतील अनुभव त्यांनी मांडला.

उपमुख्यमंत्र्यांनी अमरावतीतील पाणीटंचाई, खराब रस्ते, कचरा व्यवस्थापन, लटकलेल्या वीजतारा, स्ट्रीट लाईट, गटार व्यवस्था, उद्याने, मैदान, स्टेडियम, रुग्णालये अशा मूलभूत प्रश्नांवर थेट भाष्य केले.

नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून कचरा प्रकल्पाचा मार्ग काढणारच, अंडरग्राउंड वीजजाळे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि भक्कम रस्ते देण्याचा शब्द त्यांनी दिला.

अमरावती महापालिकेसाठी गार्डन विकासाकरिता १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती देत, भविष्यात आणखी तरतूद केली जाईल, असे त्यांनी सांगितले. रस्ते व पाणीपुरवठा योजनांसाठी नगरविकास विभागामार्फत निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाषणाच्या शेवटी त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,“अमरावतीचा कायापालट करायचा असेल, विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. १५ तारखेला मतदान नाही, तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला होणार आहे.”

सभेला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ, माजी मंत्री जगदीश गुप्ता, जलसंधारण मंत्री संजय राठोड, ज्ञानेश्वर धाने पाटील, माजी आमदार संजय रायमुलकर, प्रियांका विश्वकर्मा, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

8 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

8 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

8 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

8 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

13 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

13 तास ago