सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे.
मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्याचा पोरगा म्हणून मी राजकारणात आलो असल्याचा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांना लगावला.
भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ना. मकरंद पाटील यांच्यात चांगलेच बिनसले आहे. ना. मकरंद पाटील यांनी दहिवडीतील कार्यक्रमात ना. गोरे यांच्यावर टीका केली होती. बुधवारी ना. गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ना. मकरंद पाटील यांना प्रतिटोला लगावला आहे.
ना. गोरे म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. या पक्षाचा कार्यकर्ता ज्या-ज्या ठिकाणी आहे त्या-त्या ठिकाणी त्याला बळ देण्यासाठी मला जावे लागेल आणि मी जाणार. ते त्यांचा पक्ष वाढवतात; मी माझा पक्ष वाढवतोय. कोणी कुणाला असुरक्षित वाटून घ्यायचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आलंय ते निवडणूक आयोगाला व तुम्हालाही माहिती आहे. मी पण पन्नास हजार मतांनी निवडून आलो आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत नाही. मी कोणा संस्थानिकाचा किंवा राजा महाराजाचा मुलगा नाही.
मी सर्व सामान्य शेतकर्याच्या पोटी जन्माला आलो आहे. 2009, 2014, 2019 अशा निवडणुका मी लढवून जिंकलो आहे. प्रस्थापित व्यवस्थेशी मी संघर्ष केला आहे. हा संघर्ष कायम ठेवून राज्यात काम करतो आहे हे सर्वांना ज्ञात आहे. मकरंद पाटलांनी ज्यांचा प्रवेश घडवून आणला ते पूर्वीपासूनच माझ्या विरोधात आहेत. केवळ दाखवायचं म्हणून हा पक्षप्रवेश झाला आहे का याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे. मी यापूर्वी 50 हजार मतांनी निवडून आलो आहे. कुणी सांगायचे कारण नाही. महायुतीमध्ये सगळं अलबेल नाही का असे विचारले असता सगळे व्यवस्थित आहे, असे देखील ना. गोरे म्हणाले.
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…