महाराष्ट्र

मी संस्थानिकांचा, राजा महाराजांचा मुलगा नाही; जयकुमार गोरे

सातारा: प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी काम करत असतो. मी माझा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय तसाच ते देखील करत आहेत. मात्र, कोणी असुरक्षित वाटून घेण्याचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आले आहे ते निवडणूक आयोग व तुम्हालाही माहीत आहे.

मी संस्थानिकांचा मुलगा नाही, मी राजा महाराजांच्या कुटुंबातून आलेलो नाही, सामान्य शेतकर्‍याचा पोरगा म्हणून मी राजकारणात आलो असल्याचा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी ना. मकरंद पाटील यांना लगावला.

भाजपचे नेते ना. जयकुमार गोरे व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते ना. मकरंद पाटील यांच्यात चांगलेच बिनसले आहे. ना. मकरंद पाटील यांनी दहिवडीतील कार्यक्रमात ना. गोरे यांच्यावर टीका केली होती. बुधवारी ना. गोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ना. मकरंद पाटील यांना प्रतिटोला लगावला आहे.

ना. गोरे म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. या पक्षाचा कार्यकर्ता ज्या-ज्या ठिकाणी आहे त्या-त्या ठिकाणी त्याला बळ देण्यासाठी मला जावे लागेल आणि मी जाणार. ते त्यांचा पक्ष वाढवतात; मी माझा पक्ष वाढवतोय. कोणी कुणाला असुरक्षित वाटून घ्यायचे कारण नाही. कोण किती मतांनी निवडून आलंय ते निवडणूक आयोगाला व तुम्हालाही माहिती आहे. मी पण पन्नास हजार मतांनी निवडून आलो आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे लक्ष देत नाही. मी कोणा संस्थानिकाचा किंवा राजा महाराजाचा मुलगा नाही.

मी सर्व सामान्य शेतकर्‍याच्या पोटी जन्माला आलो आहे. 2009, 2014, 2019 अशा निवडणुका मी लढवून जिंकलो आहे. प्रस्थापित व्यवस्थेशी मी संघर्ष केला आहे. हा संघर्ष कायम ठेवून राज्यात काम करतो आहे हे सर्वांना ज्ञात आहे. मकरंद पाटलांनी ज्यांचा प्रवेश घडवून आणला ते पूर्वीपासूनच माझ्या विरोधात आहेत. केवळ दाखवायचं म्हणून हा पक्षप्रवेश झाला आहे का याचे आत्मपरीक्षण त्यांनीच करावे. मी यापूर्वी 50 हजार मतांनी निवडून आलो आहे. कुणी सांगायचे कारण नाही. महायुतीमध्ये सगळं अलबेल नाही का असे विचारले असता सगळे व्यवस्थित आहे, असे देखील ना. गोरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

21 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

21 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

21 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

21 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

21 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

21 तास ago