महाराष्ट्र

आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल…

मुंबई: आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे.

भाजपनेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षांतर घडवून आणले आणि महाविकास आघाडी सरकार पाडले हे राज्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच नव्हे, तर राज्यातील आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्येही भाजपला धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील मतदार वाट पाहत आहेत, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

भाजपच्या अंतर्गत पाहणीतही महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या कामचुकारपणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ईडी सरकारच्या गोंधळी कारभाराने प्रशासन ठप्प झाले आहे त्यामुळेच कल्याणकारी राज्याची संकल्पना केवळ कागदावरच आहे, अशी टीकाही महेश तपासे यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला साफ नाकारले गेले आहे परंतु भाजप महाराष्ट्राप्रमाणेच पक्षांतरासारखे अन्यायकारक मार्ग वापरून पुन्हा सत्तेवर आला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

18 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

2 दिवस ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

2 दिवस ago