औरंगाबाद: सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या अनेक फेऱ्या माराव्या लागतात. मात्र आता रेशनकार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता.
नवीन रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
तुमच्या राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. https://mahafood.gov.in/
तुमच्या आयडीने लॉग इन करा किंवा नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा.
Apply online for ration card’ या पर्यायावर क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे (ओळख पुरावा आणि इतर) अपलोड करा.
सर्व माहिती भरा आणि अर्ज शुल्क भरा.
तुम्हाला एक पोचपावती (receipt) मिळेल.
कोणती कागदपत्रे लागतील
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र
वीज बिल किंवा पाणी बिल
उत्पन्नाचा दाखला
रेशन कार्ड कधी काढता येते
रेशन कार्ड 18 वर्षानंतर काढता येते. या रेशन कार्ड मध्ये 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांची नावे देखील टाकता येतात.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…