महाराष्ट्र

त्या सरकारी निरीक्षणगृहातील अधीक्षकांची तात्काळ हकालपट्टी करा

मुंबई: उल्हासनगर येथील सरकारी निरीक्षणगृहातील कार्यरत असलेल्या अधीक्षकांची हकालपट्टी करत विशेषगृहातील सेवक दर तीन वर्षानी बदलावे अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महिला व बाल विकास प्रशासन यांच्याकडे केली आहे.

उल्हासनगर मुलींच्या सरकारी निरीक्षणगृहातून ८ मुली पळून गेल्या होत्या. याबाबत घटनास्थळी माहिती घेतली असता प्रामुख्याने मुलींना चांगले स्वच्छतागृह नाहीत. जेवणाची व्यवस्थित सोय नाही. राहण्यासाठी योग्य खोली नाही अशा अनेक गोष्टी समोर आले आहेत. यामुलींना स्थानिक अधिकाऱ्यांकडून वागणूक देखील व्यवस्थित मिळत नसल्याचे माझ्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे.या व अशा ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्याबाबतीत व्यवस्थित वागणूक मिळावी याकरिता उप सभापती नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री,उपमुख्य मंत्री,महिला व बालविकास विभाग यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

उल्हासनगर निरिक्षणगृह येथे सध्या कार्यरत असलेल्या अधीक्षक व तेथील कर्मचारी व सेवक यांच्यावर कारवाई करून तेथून त्यांना तात्काळ दूर करावे. राज्यातील विशेषगृह अधीक्षकाचे पद हे जाहिरात काढून ठराविक काळासाठी भरणे आणि एकाच व्यक्तीची तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणत्याही परिस्थितीत नेमणूक न करता पदावरील व्यक्ती नामनिर्देशनाद्वारे बदलावेत. विशेष गृहातील सेवक दर तीन वर्षांनी बदलण्यात यावेत.

निरीक्षण गृहातील मुलींसाठी समुपदेशन आणि कौशल्य विकास कार्यक्रम गरजेचे आहे. त्याचबरोबर मुली व महिला पीडित व आरोपी वरील कोर्ट केसेस जलद गतीने चालवून निकाली काढाव्यात एका खोलीत मुलींची संख्या क्षमता ठरविणे, मुलींचे जगणे दर्जात्मक करणे, स्वच्छतागृहे व झोपण्यासाठी चांगले बिछाने,गाद्या व चादरी पुरविण्याच्या सूचना संबंधीतीत अधिकारी यांना तात्काळ देण्याची सोय करावी या प्रमुख मागण्यांचा समावेश विधान परिषद उपसभापती डॉ.गोर्हे यांच्या पत्रात करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…

40 मिनिटे ago

शिरूर शहरात महिलेची रस्त्यातच प्रसूती; माणुसकीचे घडले दर्शन पण…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…

2 तास ago

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…

7 तास ago

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…

7 तास ago

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…

8 तास ago

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…

8 तास ago