महाराष्ट्र

खुशखबर! रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता शहरात लवकरच धावणार मेट्रो…

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील वाढती लोकसंख्या आणि जालना रोडवरील होणारी वाहतूक कोंडी पाहता शेंद्रा ते वाळूज एमआयडीसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एप्रिलमध्ये केली होती. त्यामुळे याच प्रकल्पात साडेआठ किमी अंतराचा डबल डेकर उड्डाणपूल उभारुन त्यावर मेट्रो सेवा सुरु करण्याचे नियोजन महामेट्रोकडून करण्यात आले होते
दरम्यान, भागवत कराड यांनी घेतलेल्या पुढाकाराने अखेर महामेट्रो कंपनीने औरंगाबाद शहरातील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचा डीपीआरचे काम पूर्ण केले असून या डीपीआर नुसार या मेट्रो रेल्वे मार्गासाठी एकूण 6 हजार 800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उद्या सोमवारी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि महापालिका प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्यासमोर डीपीआर सादर केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील विकासात भर…
आशिया खंडात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहर म्हणून औरंगाबादची ओळख असून शहरात मेट्रो रेल्वे सुरु झाल्यास यामुळे विकासात भर पडणार आहे. वाळूज ते शेंद्रा असा मोठा अंतर मेट्रोमुळे काही मिनटात पार करता येईल. तर नव्याने विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीपर्यंतचा प्रवास देखील सोपा होणार आहे.
वाळूज एमआयडीसी आणि डीएमआयसी एकेमकांना जोडणार…
वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा डीएमआयसी असा अखंड 25 किलोमीटरचा उड्डाणपूल तयार झाल्यास याचा मोठा फायदा उद्योजकांना होणार आहे. कारण जिल्ह्यातील सर्वात मोठी एमआयडीसी समजल्या जाणारे वाळूज शहर आणि शेंद्रा एमआयडीसीसोबतच नव्याने तयार होत असलेल्या डीएमआयसीचा प्रवास सोपा होणार आहे. त्यामुळे दोन्ही महत्वाच्या एमआयडीसी एकेमकांना जोडल्या जातील. यामुळे उद्योजकांचा दळणवळणाचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. सोबतच मेट्रो रेल्वेचा देखील प्रवाशांना फायदा होईल.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

23 मिनिटे ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

26 मिनिटे ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

4 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

4 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

4 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

4 तास ago