सांगली: सांगली शहरासह उपनगरांत घराच्या दरवाजावर थाप मारून किंवा बेल वाजवून दार उघडताच महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पळ काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. सकाळी–सायंकाळी फिरायला बाहेर पडलेल्या महिलांनाही लक्ष्य केले जात आहे. ग्रामीण भागातही अशा प्रकारच्या चोरींची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे.
दार उघडण्यापूर्वी खात्री करा
बेल वाजल्यानंतर बाहेर कोण आहे, व्यक्ती ओळखीची आहे का, याची खात्री करूनच दरवाजा उघडावा. घाईत किंवा निष्काळजीपणाने दार उघडणे धोकादायक ठरू शकते.
दरवाजाला लेन्स आहे का?
दरवाजाच्या मध्यभागी बसवलेली लेन्स (डोअर व्ह्यूअर) उपयुक्त ठरते. बेल वाजल्यानंतर लेन्समधून बाहेर उभ्या व्यक्तीची ओळख पटवता येते. लेन्स नसल्यास सेफ्टी चेन लावून फटीतून पाहावे. शक्य असल्यास चॅनल गेट आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणेही सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरते.
रात्री विशेष खबरदारी
रात्री-अपरात्री दरवाजा वाजल्यास प्रथम लेन्स किंवा खिडकीतून पाहावे. ओळख पटल्याशिवाय दरवाजा पूर्ण उघडू नये. शंका असल्यास शेजाऱ्यांची मदत घ्यावी.
संकटात ११२ डायल करा
अनोळखी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ ११२ वर कॉल करून मदत मागावी. स्थानिक पोलिस ठाण्याचा संपर्क क्रमांक जवळ ठेवणेही आवश्यक आहे.सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…