महाराष्ट्र

कोकणातील काजू उत्पादकांवर अन्याय? ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’ चंदगडला नेण्यावरून संताप

रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रमुख काजू उत्पादक पट्टा असलेल्या कोकणातून ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’चे मुख्यालय चंदगड येथे स्थापन करण्याच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे. कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राज्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड असून, त्यातील मोठा हिस्सा कोकणात आहे. तसेच काजू प्रक्रिया करणारे सुमारे ४०० उद्योग कोकण विभागात कार्यरत आहेत. देशातील मोठ्या प्रमाणातील काजू प्रक्रिया कोकणातून होत असताना बोर्डाचे मुख्यालय कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे नेण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या निर्णयाची घोषणा हलकर्णी येथे झाल्यानेही टीका होत आहे. “जिथे उत्पादन होते तिथे निर्णय न घेता, राजकीय प्रभाव असलेल्या भागात निर्णय घेतले जात आहेत,” असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. काहींनी याला “हलकर्णी पॅटर्न” असे संबोधत प्रादेशिक असंतोषाला हवा दिली आहे.

कोकणातील काजू उत्पादकांचे म्हणणे आहे की, बोर्ड कोकणात स्थापन झाले असते तर स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. तसेच शेतकरी आणि उद्योगांना प्रशासकीय कामांसाठी कोल्हापूरपर्यंत हेलपाटे मारावे लागणार असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सरकारकडून या निर्णयामागील नेमकी भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, कोकणातील विविध संघटना आणि शेतकरी प्रतिनिधींनी बोर्डाचे मुख्यालय कोकणातच स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथून भक्तिमय वातावरणात न्यू वाघेश्वर दिंडीचे आषाढी वारीसाठी प्रस्थान…

शिरूर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात विठ्ठलनामाचा गजर सुरू असताना शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र वाघाळे…

16 तास ago

‘अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण द्या’; मुख्यमंत्री फडणवीसांकडे राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांचे निवेदन; महाराष्ट्र शासनाने केंद्राकडे तातडीने शिफारस पाठवावी, अशी मागणी…

16 तास ago

एक तालुका – एक क्लस्टर’ योजनेला ब्रेक; राज्यातील १९१ तालुके अजूनही औद्योगिक विकासापासून वंचित; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील 'एक तालुका – एक क्लस्टर' योजनेची अंमलबजावणी संथ गतीने होत असल्याने महाराष्ट्रातील ३५५…

16 तास ago

पोलीस भरतीला वार्षिक कॅलेंडरची दिशा; सत्यजीत तांबे यांच्या मागणीला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

एमपीएससीप्रमाणे पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक तयार करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे आश्वासन मुंबई: राज्यातील लाखो…

16 तास ago

दादागिरी, खंडणी आणि धमक्यांना शून्य सहनशीलता; तक्रार करा, कठोर कारवाई करू – पीआय चंद्रशेखर यादव

शिक्रापूर पोलिसांची व्यापाऱ्यांसोबत समन्वय बैठक; वाहतूक, अतिक्रमण, पार्किंगसह सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाययोजनांचे आश्वासन शिक्रापूर (अक्षय टेमगिरे):…

20 तास ago

कॅमेऱ्यासमोरील बडबड सोडा, मैदानात उतरून कर्तृत्व दाखवा; विरोधकांवर शिवसेनेचा निशाणा

मुंबई: विरोधकांनी कॅमेऱ्यांसमोर आक्रमक आणि अर्वाच्य भाषा वापरण्याऐवजी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा, असे…

20 तास ago