शिरूर पोलिसांचा मानवतेचा चेहरा! शेतकरी महिलेसाठी नाथा जगताप ठरले ‘देवदूत’

शिरूर (अक्षय टेमगिरे): आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी देवदूताची भूमिका बजावत मानवतेचे दर्शन घडवले आहे.

दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास कांदा विक्रीचे पैसे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेला अवघ्या दीड ते दोन तासांत तिची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून देण्यात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांना यश आले. त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मार्केट यार्डमध्ये कांदा विक्री करून मिळालेले पैसे पर्समध्ये ठेवून दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डकडून बसस्थानकाच्या दिशेने जात होती. शिरूर बसस्थानकासमोरील गतिरोधकाजवळ तिची पर्स दुचाकीवरून नकळत रस्त्यावर पडली. त्या पर्समध्ये कांदा विक्रीची रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.

दरम्यान, ती पर्स एका प्रामाणिक जोडप्याला सापडली. त्यांनी ती उचलून घेतली. पर्स हरवल्याची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांनी त्या जोडप्याचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला.यानंतर संबंधित जोडप्याने प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली पर्स शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केली.

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते ती पर्स संबंधित शेतकरी महिलेला परत देण्यात आली. तसेच प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या जोडप्याचे अभिनंदन करण्यात आले.अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या शेतकरी महिलेसाठी पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप हे अक्षरशः देवदूत ठरले असून त्यांच्या तत्परतेमुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.या संपूर्ण घटनेमुळे शिरूर तालुक्यात पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

२०१ जोडप्यांना दिल्या शुभेच्छा बोईसर: शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या…

26 मिनिटे ago

कोकणातील काजू उत्पादकांवर अन्याय? ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’ चंदगडला नेण्यावरून संताप

रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रमुख काजू उत्पादक पट्टा असलेल्या कोकणातून ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’चे मुख्यालय चंदगड येथे स्थापन…

13 तास ago

वरळीतील नाला सफाईची राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष पाहणी

मुंबई: मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

13 तास ago

मुंबई ते सुरजागड! विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; एकनाथ शिंदे

मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…

1 दिवस ago

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू…

1 दिवस ago