शिरूर (अक्षय टेमगिरे): आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी देवदूताची भूमिका बजावत मानवतेचे दर्शन घडवले आहे.
दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास कांदा विक्रीचे पैसे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेला अवघ्या दीड ते दोन तासांत तिची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून देण्यात शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांना यश आले. त्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मार्केट यार्डमध्ये कांदा विक्री करून मिळालेले पैसे पर्समध्ये ठेवून दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्डकडून बसस्थानकाच्या दिशेने जात होती. शिरूर बसस्थानकासमोरील गतिरोधकाजवळ तिची पर्स दुचाकीवरून नकळत रस्त्यावर पडली. त्या पर्समध्ये कांदा विक्रीची रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती.
दरम्यान, ती पर्स एका प्रामाणिक जोडप्याला सापडली. त्यांनी ती उचलून घेतली. पर्स हरवल्याची माहिती मिळताच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून त्यांनी त्या जोडप्याचा शोध घेत त्यांच्याशी संपर्क साधला.यानंतर संबंधित जोडप्याने प्रामाणिकपणा दाखवत सापडलेली पर्स शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केली.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते ती पर्स संबंधित शेतकरी महिलेला परत देण्यात आली. तसेच प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या जोडप्याचे अभिनंदन करण्यात आले.अत्यंत कठीण परिस्थितीत असलेल्या शेतकरी महिलेसाठी पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप हे अक्षरशः देवदूत ठरले असून त्यांच्या तत्परतेमुळे महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे.या संपूर्ण घटनेमुळे शिरूर तालुक्यात पोलीस हवालदार नाथा साहेब जगताप यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
२०१ जोडप्यांना दिल्या शुभेच्छा बोईसर: शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या…
रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रमुख काजू उत्पादक पट्टा असलेल्या कोकणातून ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’चे मुख्यालय चंदगड येथे स्थापन…
मुंबई: मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…
मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू…