महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा…

हजारो नागरिकांनी घेतला मोर्चात सहभाग

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद’चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, धाराशिव करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरुन आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये अनेक तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, “खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा.” दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.

यामध्ये विश्व हिंदू परिषद, भाजपा, शिवसेना यांच्यासह इतर संघटनांनी सहभाग नोंदवला. मात्र सामाजिक शांतता बिघडेल, त्यामुळे परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी आयोजकांना सांगितले. तरीदेखील क्रांती चौक भागातून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह ठाकुर, शिवेंद्रे राजे भोसले यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते सहभागी झाले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौक भागातून दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली. जवळपास एक किलोमीटर लांब इतकी गर्दी या मोर्चात सहभागी झाली. हजारो नागरिकांनी हातात भगवे ध्वज घेत छत्रपती संभाजीनगर या नावाला समर्थन दर्शविले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

21 मिनिटे ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

27 मिनिटे ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

33 मिनिटे ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

3 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

14 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

14 तास ago