महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा जनगर्जना मोर्चा…

हजारो नागरिकांनी घेतला मोर्चात सहभाग

औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने औरंगाबाद’चे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद, धाराशिव करण्यास परवानगी दिली. मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरुन आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता आज सकल हिंदू समाजाने ‘जनगर्जना मोर्चा’ काढला. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चामध्ये अनेक तरुणांनी, महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, “खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा.” दरम्यान, शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.

यामध्ये विश्व हिंदू परिषद, भाजपा, शिवसेना यांच्यासह इतर संघटनांनी सहभाग नोंदवला. मात्र सामाजिक शांतता बिघडेल, त्यामुळे परवानगी नाकारल्याचे पोलिसांनी आयोजकांना सांगितले. तरीदेखील क्रांती चौक भागातून भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तेलंगणाचे भाजप आमदार राजा सिंह ठाकुर, शिवेंद्रे राजे भोसले यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड, राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्यासह इतर नेते सहभागी झाले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने क्रांती चौक भागातून दुपारी बाराच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला. औरंगपुरा येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाची सांगता करण्यात आली. जवळपास एक किलोमीटर लांब इतकी गर्दी या मोर्चात सहभागी झाली. हजारो नागरिकांनी हातात भगवे ध्वज घेत छत्रपती संभाजीनगर या नावाला समर्थन दर्शविले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपतीतील सोन्याच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करत ८२ चांदीचे जोडवे लांबवले

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती येथील एका सराफ दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चार अज्ञात…

5 तास ago

पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या; नवीन कायद्यांपेक्षा अंमलबजावणी महत्त्वाची; विजय वडेट्टीवार

पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील अन्याय, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि मालमत्ता नोंदणीच्या नव्या पोर्टलवर काँग्रेसची केंद्र व राज्य…

12 तास ago

मोबाईलवर SMS आल्याशिवाय मिळणार नाही कर्जमाफी! E-KYC आणि आधार पडताळणी अनिवार्य

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी SMS, E-KYC, Agristack आणि DBT प्रक्रिया…

12 तास ago

झोपेत घोरण्याचा त्रास

घोरणे हा एक उष्णता विकार आहे. उष्णतेमुळे घशाला सूज येते. घशातील पडजिभेला सूज येते. पडजीभ…

12 तास ago

मुलांमधील व्हिटॅमिन-डी ची कमतरता

व्हिटॅमिन-डी आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. शरीराच्या अनेक महत्त्वाचे कार्य करण्यासाठी याची आवश्यक असते. पण जर त्याची…

12 तास ago

सकाळच्या या चुकांमुळे लिव्हर होतं खराब

लिव्हर आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराचं कामकाज…

13 तास ago