महाराष्ट्र

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे.

या मागणीला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच माझ्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. “मुंडेंनी माझ्या घातपाताचा कट रचला आहे”, असा गंभीर दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका इथेच थांबलेली नाही. बीड जिल्ह्यातील एका कथित ऑडिओ क्लिपमध्ये स्वतःला ‘कराड समर्थक’ म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांना थेट गोळ्या घालून मारण्याची धमकी दिल्याचा दावा समोर आला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे याआधी जरांगे पाटील यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान मंत्री धनंजय मुंडे यांनीही स्वीकारलं होतं. त्यानंतर काही काळ दोघांमधील वाद निवळल्याचं चित्र होतं. मात्र, अमोल खुणेला हत्येच्या कटप्रकरणातून जामीन मंजूर झाल्यानंतर हा संघर्ष पुन्हा एकदा टोकाला पोहोचताना दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कटामागे नेमकं कोण आहे? जरांगेंच्या आरोपांना धनंजय मुंडे प्रतिआव्हान देणार का? तसेच बीडमधील हा वाढता राजकीय संघर्ष आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर काय परिणाम करणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

3 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

9 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

9 तास ago