महाराष्ट्र

हर्सूलमध्ये १५० मालमत्तांवर फिरणार जेसीबी; बघा कोणत्या मालमत्ता होणार बाधित

संभाजीनगर: हर्सूलमध्ये जाणारा जुना जळगाव रोड आता २०० फुटांचा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नगररचना विभागाने मोजणी आणि मार्किंग सुरू केले असून, सुमारे १५० मालमत्ता पाडण्यात येणार आहेत.

हर्सूल टी पॉइंट ते पाझर तलावापर्यंतचा रस्ता रुंद करणार

महापालिकेच्या पथकाने मंगळवारी (१५ जुलै) सकाळीच हर्सूलमध्ये येऊन रस्त्याचा केंद्रबिंदू निश्चित करून दोन्ही बाजूंनी ३० मीटरची मोजणी केली. मार्किंगच्या वेळी अनेक नागरिकांनी विरोध दर्शवला, मात्र कर्मचाऱ्यांनी समजावून सांगत काम पूर्ण केले.

कोणत्या मालमत्तांवर कारवाई होणार

६५ निवासी,

४५ व्यवसायिक

४० मिश्र प्रकारच्या मालमत्ता

बाधित होणार असून व्यावसायिक मालमत्तांवर लवकरच जेसीबी फिरणार असून, निवासी मालमत्तांसाठी न्यायालयाने १५ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

मालमत्ता वाचवण्यासाठी नागरिकांची धावपळ

मार्किंग होताच अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानं, स्टॉल्स काढण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक जण आपल्या घराची कागदपत्रं घेऊन महापालिकेचे उंबरठे झिजवत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

13 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

18 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

18 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

18 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

18 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

20 तास ago