महाराष्ट्र

पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार शीतल करदेकर यांना जाहीर

पुणे: आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘हास्य-विनोद आनंद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ११ ते १३ ऑगस्ट या कालावधीत शिवाजीनगर येथील लकाकी रस्त्यावरील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठान, विनोद विद्यापीठ येथे हा महोत्सव पार पडेल, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. बाबूराव कानडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी, कमलाकर बोकील, सल्लागार डॉ. आनंद देशपांडे आदी उपस्थित होते.

या महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. ११) विसुभाऊ बापट यांच्या हस्ते सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यानंतर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी इंद्रधनू हा कार्यक्रम सादर होणार आहे. तर, १३ ऑगस्टला न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण समारंभाने महोत्सवाचा समारोप होणार आहे. या सोहळ्यात आचार्य अत्रे यांच्या नावे कवी, विडंबनकार, विनोदी लेखक, वक्ते, व्यंगचित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, नाटककार, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, उद्योगपती आदींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी धाडसी पत्रकार शीतल करदेकर यांना पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

4 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

4 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

4 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

15 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

16 तास ago