महाराष्ट्र

कामगार कायदे लागू, मात्र माध्यमकर्मी अजूनही वंचित; पत्रकार नोंदणीचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: केंद्र सरकारने देशात चार नवीन कामगार कायदे लागू करून कामगार सुधारणा दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलले असले, तरी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांतील पत्रकार व माध्यमकर्मी या कल्याणकारी तरतुदींंपासून अजूनही वंचित असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील हजारो माध्यमकर्मी आजही सामाजिक सुरक्षा, नोंदणी, किमान वेतन आणि कल्याणकारी योजनांपासून दूर आहेत.

देशात उसतोड, वीटभट्टी, बांधकाम, घरकाम करणाऱ्या कामगारांची नोंद करून त्यांना श्रमिक म्हणून विविध लाभ दिले जातात. मात्र प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत पत्रकार, कॅमेरामन, तांत्रिक कर्मचारी, वृत्त संकलक यांची अधिकृत नोंदच होत नसल्याने ते कायदेशीर संरक्षणापासून वंचित राहतात, ही बाब गंभीर असल्याचे जाणकारांचे मत आहे.

चार कामगार कायदे, पण माध्यमकर्मी कुठे बसतात?

वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२० आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य व कार्यअटी संहिता २०२० असे चार कायदे लागू झाले आहेत. या कायद्यांतर्गत किमान वेतन, मातृत्व रजा, समान वेतन, सामाजिक सुरक्षा, अपघात संरक्षण यासारख्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

मात्र या सगळ्यातून प्रसारमाध्यम क्षेत्रातील श्रमिकांचा स्पष्ट उल्लेख किंवा प्रभावी अंमलबजावणी दिसून येत नाही.

नोंदणी आणि कल्याणकारी मंडळाचा प्रश्न प्रलंबित

माध्यमकर्मींनी अनेक वर्षांपासून पत्रकार नोंदणी आणि स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी लावून धरली आहे. काही राज्यांमध्ये मर्यादित स्वरूपात योजना राबवल्या जात असल्या, तरी महाराष्ट्रात या संदर्भात शासनाची इच्छाशक्ती अपुरी असल्याचा आरोप केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात पत्रकार महामंडळाबाबत चर्चा झाली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाला मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात सर्वसामान्य माध्यमकर्मींना त्याचा लाभ अद्याप मिळालेला नाही.

शहरी पत्रकारांची अवस्था अधिक बिकट

ग्रामीण भागातील पत्रकारांची परिस्थिती कठीण असल्याची चर्चा होत असते, मात्र शहरी भागातील माध्यमकर्मींची अवस्था त्याहूनही बिकट असल्याचे वास्तव समोर येत आहे. आर्थिक अस्थिरता, नोकरीची असुरक्षितता, दबावाचे राजकारण आणि कोणतीही सामाजिक सुरक्षा नसणे, यामुळे माध्यमकर्मी तणावाखाली काम करत आहेत.

प्रश्न सरकारला

कामगार कायदे सर्व श्रमिकांसाठी असतील, तर माध्यमकर्मी त्यातून वगळले का जात आहेत?

राजकीय फायद्यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी करणारे नेते, माध्यमकर्मींना श्रमिक म्हणून मान्यता देण्यासाठी पुढाकार का घेत नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकशाहीचा आरसा असलेली प्रसारमाध्यमे सक्षम, निर्भय आणि सुरक्षित नसतील, तर लोकशाहीच कमकुवत होईल, अशी भावना माध्यम क्षेत्रातून व्यक्त होत आहे. त्यामुळे माध्यमकर्मींना तातडीने नोंदणी, सामाजिक सुरक्षा आणि सर्व कल्याणकारी लाभ देण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

8 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

9 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

11 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

11 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

11 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

12 तास ago